शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'डायनासोरप्रमाणे काँग्रेस नामशेष होणार'; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 18:08 IST

'काँग्रेसची अवस्था 'बिग बॉस'च्या घरासारखी झाली. ते दररोज एकमेकांशी भांडतात.'

Lok Sabha Election: एकीकडे सत्ताधारी भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत मोठ्या विजयाचा दावा करत आहे, तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये छोटे-मोठे वाद सुरुच आहेत. अशातच, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसमधील या वादाची तुलना रिॲलिटी शो 'बिग बॉस'शी केली. तसेच, पुढील काही वर्षात डायनासोरप्रमाणे काँग्रेसदेखील नामशेष होणार असल्याचे म्हटले. 

काँग्रेस 'बिग बॉस'सारखीउत्तराखंडमधील गौचर येथे एका सभेला संबोधित करताना संरक्षण मंत्री म्हणाले की, काँग्रेसमधून नेत्यांची पलायन सुरू आहे. काँग्रेसचे नेते एकापाठोपाठ एक पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. येत्या काही वर्षांत काँग्रेस डायनासोरप्रमाणे या पृथ्वीवरून नामशेष होण्याची भीती आहे. भविष्यात कुणी काँग्रेसचे नाव घेईल, तेव्हा मुले विचारतील काँग्रेस कोणता पक्ष आहे? काँग्रेसची अवस्था 'बिग बॉस'च्या घरासारखी झाली आहे. ते दररोज एकमेकांचे कपडे फाडत असतात. 

मोदींमुळे युद्ध थांबले...युक्रेनमध्ये अडकलेल्या 22,500 भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्याशी चर्चा केल्यानंतर रशिया-युक्रेन युद्ध चार तासांपेक्षा जास्त काळ स्थगित करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. राजनाथ सिंह म्हणाले की, भारताने गेल्या काही वर्षांत केलेली प्रगती जग स्वीकारत आहे.

संरक्षण क्षेत्रात भारताची प्रगतीआता आपण आपली बहुतांश संरक्षण उपकरणे भारतात तयार करतो. पूर्वी देश फक्त 600 कोटी रुपयांच्या संरक्षण उपकरणांची निर्यात करायचा. अवघ्या सात वर्षांत आम्ही 21000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची संरक्षण उपकरणे निर्यात केली. भारत आता सामान्य देश राहिलेला नाही. काँग्रेस जनतेला खोटी आश्वासने देत आहेत. त्यांनी जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांपैकी 50 टक्के आश्वासने पूर्ण केली असती, तर भारत एक विकसित देश झाला असता, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपा