शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 04:56 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ मे रोजीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी भाजपच्या सर्व ९३ उमेदवारांना पत्र लिहून काही निवडणुकीतील मुद्द्यांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यास सांगितले आहे.

संजय शर्मा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या टप्प्यातील भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना वेगवेगळी पत्रे लिहून तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठीचे धोरण स्पष्ट केले आहे. या पत्रामध्ये लिहिलेले मुद्दे मतदारांपर्यंत पोहोचवावे आणि काँग्रेस पक्षाला विभाजनवादी असल्याचे उघडपणे सांगावे, असे उमेदवारांना सांगण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ मे रोजीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी भाजपच्या सर्व ९३ उमेदवारांना पत्र लिहून काही निवडणुकीतील मुद्द्यांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यास सांगितले आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री मनसुख मंडविया, ज्योतिरादित्य सिंधिया, प्रल्हाद जोशी, एसपी सिंह बघेल, माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह ९३ उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे.

पत्रातील मुद्दे काय?

 काँग्रेसच्या विभाजनवादी धोरणांबाबत मतदारांना माहिती द्यावी.

 काँग्रेस एससी, एसटी आणि ओबीसी वर्गाचे आरक्षण काढून घेऊन धर्माच्या आधारावर आरक्षण देऊ इच्छिते.

 धर्माच्या नावावरील आरक्षण अनैतिक असले तरी व्होट बँकेसाठी काँग्रेस असे गैरप्रयत्न करीत आहे.

 वारसा कर लागू करणे ही काँग्रेसची धोकादायक कल्पना असल्याचे सांगून पंतप्रधानांनी देशातील जनतेला याची जाणीव करून द्या.

 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या टप्प्यापर्यंत विविध मुद्द्यांवर भाजप उमेदवारांच्या नावे पंतप्रधान मोदी यांची पत्रे तयार आहेत.

 निवडणुकीचा जो टप्पा पूर्ण होईल, त्यानंतर लगेच पुढील टप्प्यातील उमेदवारांची पत्रे पाठवली जातील. प्रत्येक निवडणुकीतील मुद्दे वेगवेगळे असतील.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक