शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
11
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

आधी गळाभेट अन् आता हँडशेक...नवीन संसदेत दिसली मोदी-राहुल यांची अनोखी केमिस्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 17:04 IST

18 व्या लोकसभेत विरोधकांचे संख्याबळ वाढल्याने सभागृहातील नेत्यांमधील केमिस्ट्री बदलली आहे.

Lok Sabha Election : काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुका पार पडल्या अन् देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील NDA चे सरकार स्थापन झाले. पण, या 18व्या लोकसभेचे चित्र 2014 आणि 2019 च्या लोकसभेपेक्षा वेगळे असणार आहे. त्याची झलक बुधवारी(दि.26) लोकसभा अध्यक्षांच्या निवडीवेळी दिसून आली. या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष संख्याबळाच्या बाबतीत पूर्वीच्या तुलनेत कमकुवत झाला आहे, त्यामुळे विरोधकांनाही एक नवसंजिवणी मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच राहुल गांधी विरोधी पक्षनेतेपद झाल्यामुळे विरोधकांमध्ये वेगळीच उर्जा आली आहे. त्यामुळेच आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील केमिस्ट्रीवर संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, आज भाजप नेते ओम बिर्ला यांची दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपदी निवड झाली. या निवडीनंतर सभागृहात एक वेगळेच चित्र पाहायला मिळाली. लोकसभा अध्यक्षांना त्यांच्या स्थानापर्यंत नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उठले आणि त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाही बोलावले. यावेळी दोन्ही नेत्यांनी हसत-हसत एकमेकांना हस्तांदोलन केले. एकमेकांवर अतिशय टोकाची टीका करणाऱ्या नेत्यांनी आपुलकीने हस्तांदोलन केल्यामुळे साऱ्यांच्याच भूवया उंचावल्या. आता आगामी काळात या दोन्ही नेत्यांमधील केमिस्ट्री पाहण्यासारखी असेल.

यापूर्वी राहुल गांधींनी मोदींना मिठी मारलेलीराहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी यांच्यात असे चित्र क्वचितच पाहायला मिळते. बुधवारी सभागृहात राहुल आणि मोदींनी हस्तांदोलन केल्यानंतर अनेकांना जुलै 2018 ची घटना आठवली. सुमारे सहा वर्षांपूर्वी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी सभागृहात बसलेल्या पंतप्रधान मोदींना थेट मिठी मारली होती. त्यावेळी राहुल यांनी सभागृहात जोरदार भाषणही केले होते. आपल्या भाषणात ते देशातील द्वेषाच्या वातावरणावर बोलत होते. यावेळी प्रेमाचा संदेश देण्यासाठी त्यांनी थेट पंतप्रधान मोदींना मिठी मारली. मात्र, त्यावेळी राहुल गांधींच्या या कृतीची सत्ताधाऱ्यांनी खिल्ली उडवली होती. 

संख्याबळाने चित्र बदललेराजकारणात नेत्यांची सर्वात मोठी ताकद त्यांच्या पक्षाचे खासदार आणि आमदार असतात. या संख्यात्मक ताकदीच्या जोरावरच नेता सर्वोच्च पदावर पोहोचतो. त्या आधारावर त्यांची लोकप्रियता आणि गांभीर्य ठरवले जाते. ही संख्या कमी असेल, तर त्यांची प्रतिमा कमकुवत नेत्याची बनते. हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना 100 टक्के लागू होते. गेल्या दोन निवडणुकीत काँग्रेस खासदारांची संख्या कमी असल्यामुळे त्यांना फार गांभीर्याने घेतले जात नव्हते. पण, आता विरोधकांची पॉवर वाढल्यामुळे त्यांना गांभीर्याने घेतले जाणार आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभा