शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
7
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
8
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
9
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
10
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
11
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
12
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
13
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
14
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
15
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
16
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
17
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
18
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
20
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'

Lok Sabha Election Result 2024 : "माझ्यासाठी येणारा काळ खूप कठीण; राजकीय भवितव्य आता कसं असेल हे मला माहीत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 08:33 IST

Lok Sabha Election Result 2024 And Adhir Ranjan Chowdhury : बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी त्यांच्या राजकीय भवितव्याबद्दल भीती व्यक्त केली.

Lok Sabha Election Result 2024 : पश्चिम बंगालच्या बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी त्यांच्या राजकीय भवितव्याबद्दल भीती व्यक्त केली आहे. माझे राजकीय भवितव्य आता कसं असेल हे मला माहीत नाही, असं म्हटलं आहे. एका बंगाली टीव्ही चॅनलशी बोलताना अधीर रंजन म्हणाले की, कठीण काळ येणार असल्याची भीतीही त्यांना वाटते. ते म्हणाले की, या सरकारशी (टीएमसी) लढण्याच्या प्रयत्नात मी माझ्या उत्पन्नाच्या स्त्रोताकडे दुर्लक्ष केलं आहे. मी स्वतःला बीपीएल खासदार म्हणवतो. राजकारणाशिवाय माझ्याकडे दुसरं कौशल्य नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत माझ्यासाठी अडचणी येणार आहेत आणि त्यावर मात कशी करावी हे मला माहीत नाही.

बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून टीएमसीचे उमेदवार युसूफ पठाण विजयी झाले आहेत, तर अधीर रंजन चौधरी यांचा ८५०२२ मतांनी पराभव झाला आहे. युसूफ पठाण यांना ५२४५१६ तर अधीर रंजन यांना ४३९४९४ मतं मिळाली. अधीर रंजन चौधरी यांच्या पराभवामुळे बंगालमधील काँग्रेसच्या शेवटच्या बालेकिल्ल्यांपैकी एक असलेल्या बहरमपूरवरील काँग्रेसची राजकीय पकड संपुष्टात आली आहे. बंगालमधील मालदा दक्षिणेतील केवळ एक जागा काँग्रेसने जिंकली आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अधीर रंजन चौधरी म्हणाले की, "ते लवकरच त्यांचे खासदार निवास रिकामं करण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत. माझी मुलगी सध्या शिक्षण घेत आहे आणि कधी-कधी दिल्लीला अभ्यासासाठी जाते. मला तिथे नवीन घर शोधावं लागेल, कारण माझ्याकडे एकही घर नाही."

निवडणुकीनंतर ममता बॅनर्जींच्या इंडिया ब्लॉकशी जवळीक साधताना, चौधरी म्हणाले की, त्यांनी विरोधी व्यासपीठावर टीएमसीच्या उपस्थितीवर कधीही आक्षेप घेतला नाही, परंतु त्यांनी बॅनर्जींसोबतच्या युतीला विरोध करून पक्षाची हानी केली आहे हे त्यांनी मान्य केलं. राज्य पीसीसी प्रमुखपदावर कायम राहणार का, असे विचारले असता अधीर रंजन म्हणाले की, मी निवडणुकीत माझा पराभव स्वीकारला आहे. मला माझे पद सोडायचे होते, माझ्या नेत्यांना या पदासाठी माझ्यापेक्षा योग्य कोणीतरी शोधण्याची विनंती केली, परंतु सोनिया गांधींच्या विनंतीवरून मी हा निर्णय मागे घेतला आहे. माझ्या नेत्यांचा मला अद्याप कोणताही फोन आलेला नाही. एकदा मला फोन आला की मी माझ्या पक्षाला माझी इच्छा पुन्हा सांगेन.

अधीर रंजन म्हणाले की, बहरामपूरमध्ये प्रचारासाठी कोणत्याही नेत्याला न पाठवण्याचा पक्षाचा निर्णय आहे आणि यासंदर्भात त्यांचे कोणतेही भाष्य नाही. ते म्हणाले की, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा मुर्शिदाबादला पोहोचली तेव्हा आम्ही त्यात सहभागी झालो. आमच्या पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे एकदा मालदामध्ये प्रचार करत होते, पण बहारमपूरला कधीच आले नाहीत. हा आमच्या केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय होता, ज्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालWest Bengal Lok Sabha Election 2024पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक निकाल २०२४congressकाँग्रेसTrinamool Congressतृणमूल काँग्रेस