शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
2
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
3
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
4
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
6
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
7
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
8
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
9
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
10
मोदी-शाह यांनी शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांनाही गुजरातला घेऊन जावे, काँग्रेसची बोचरी टीका
11
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
12
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
13
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
14
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
15
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
16
Mithun Chakraborty : "उपाशी पोटी फूटपाथवर झोपलो, बेरोजगार..."; मिथुन चक्रवर्तींनी लूकमुळे केला रिजेक्शन सामना
17
WhatsApp वर सुरू आहे स्कॅमर्सकडून फ्रॉडगिरी, स्वत:ला सुरक्षित ठेवायचं असल्याल वापरा या टिप्स
18
"चांगल्या माणसाला कायमच हार पत्करावी लागते", 'बिग बॉस'च्या घरातून पॅडीच्या एक्झिटनंतर मराठी अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट
19
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
20
खटा-खट... धडा-धड...! अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल! ₹9 वरून पोहोचला ₹340 वर

Prashant Kishor : "४०० पारचा नारा अपूर्ण"; BJP चा आलेख घसरण्याला कोण जबाबदार? प्रशांत किशोर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2024 10:01 AM

Lok Sabha Election Result 2024 Prashant Kishor And BJP : प्रशांत किशोर यांनी भाजपाच्या जागा कमी होण्यामागची काही कारणं सांगितली आहेत.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आले असून NDA आघाडी २९३ जागांसह केंद्रात सरकार स्थापन करणार आहे. तर इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या आहेत. हे आकडे एक्झिट पोलचे निकाल आणि निवडणूक विश्लेषकांच्या अंदाजापेक्षा खूपच वेगळे आहेत. यावर इंडिया टुडेने राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा केली.

प्रशांत किशोर यांनी भाजपाच्या जागा कमी होण्यामागची काही कारणं सांगितली आहेत. तसेच निवडणूक निकालांबाबतचं त्यांचं भाकीतही चुकीचं ठरल्याचं त्यांनी मान्य केलं. यावेळी त्यांनी भाजपाच्या '४०० पार' या नाऱ्याचा देखील उल्लेख केला.

भाजपाच्या जागा कमी होण्यामागील कारणं सांगताना प्रशांत किशोर म्हणाले की, "'४०० पार'चा हा नारा कोणी लिहिला, या नाऱ्यामध्ये काहीही चुकीचं नाही, पण हा अपूर्ण नारा आहे. '४०० पार' आहे पण कशासाठी? त्यांनी ते असंच सोडून दिलं. २०१४ मध्ये ज्याप्रमाणे  'बहुत हुई महंगाई की मार, अबकी बार मोदी सरकार' असा नारा दिला होता. कारण मोदी सरकार का हवंय तर महागाई आहे हा उद्देश स्पष्ट होता."

"४०० पार या नाऱ्यामुळे जास्त नुकसान"

"यावेळी तुम्ही ४०० पार असं म्हटलं, समाजाने हे अहंकार म्हणून घेतलं आणि विरोधकांनी हे संविधान बदलतील असं सांगितलं. ज्यांनी कोणी पक्षासाठी हा नारा लिहिला त्यांनी ४०० पार का? हेच सांगितलं नाही. ४०० पार हा नारा दिल्यामुळेच भाजपाचं सर्वत्र नुकसान झालं आहे."

"खासदारांवर नाराज होते कार्यकर्ते" 

"भाजपाची सर्वात कमकुवत गोष्ट म्हणजे मोदींवर जास्त अवलंबून राहणं. कार्यकर्ता म्हणाला, ४०० जागा येत आहेत, त्यांना (खासदार) धडा शिकवायचा आहे. तुम्ही माझ्या क्षेत्र आरा, आर के सिंह यांचं उदाहरण घेऊ शकता. तुम्ही कोणालाही विचारा लोक म्हणतात की, चांगलं काम केलं, चांगले मंत्री राहिले पण कार्यकर्ते नाराज होते कारण ते त्यांना भाव द्यायचे नाही."

वाराणसीचं दिलं उदाहरण 

"आपण नक्कीच जिंकतोय, असं भाजपा समर्थकांना वाटत होतं. काही उद्देश नव्हता कारण ४०० पार होत होतं. याउलट जे भाजपा आणि मोदींच्या विरोधात होते, त्यांच्याकडे आपण यांना कोणत्याही मार्गाने रोखलेच पाहिजे, असं उद्दिष्ट होतं. मी तुम्हाला वाराणसीचं उदाहरण देतो. २०१४ च्या तुलनेत मोदींच्या स्वतःच्या जागेवरील मतांची टक्केवारी केवळ २ टक्क्यांनी कमी झाली आहे. परंतु त्यांच्या प्रतिस्पर्ध्याचे मताधिक्य २०.९ वरून ४१ टक्क्यांपर्यंत वाढल्याने फरक लक्षणीयरीत्या खाली आला" असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी