शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

शरद पवार नाही, नितीशकुमार-चंद्राबाबुंना सोबत आणण्यासाठी युपीतील बड्या नेत्यावर जबाबदारी? दिल्लीला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 12:40 IST

Lok sabha Election Result 2024 Update: देशात नवे सरकार कोणाचे असेल हे ठरविणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू दिल्लीसाठी निघाले आहेत. अशातच मोदींनी तिसऱ्यांदा सरकार बनविणार असल्याचा दावा केला आहे.

देशात नवे सरकार कोणाचे असेल हे ठरविणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू दिल्लीसाठी निघाले आहेत. अशातच मोदींनी तिसऱ्यांदा सरकार बनविणार असल्याचा दावा केला आहे. नायडूंची टीडीपी आंध्रप्रदेशमध्ये सत्तेत येत आहे. यामुळे भाजपाला या दोघांसोबत तोडपाणी करावे लागणार आहे. या दोघांना आपल्या बाजुने वळविण्यासाठी इंडी आघाडीचे नेते प्रयत्न करू लागले आहेत. निकालाच्या दिवशी यासाठी शरद पवारांचे नाव आले होते. परंतु पवारांनी ते फेटाळले होते. आता ही जबाबदारी उत्तर प्रदेशच्या बड्या नेत्यावर सोपविण्यात येण्याची शक्यता आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये सपाने जबरदस्त मुसंडी मारत भाजपला बहुमतापासून रोखले आहे. आता तेथे बाजी मारल्यानंतर दिल्लीतील सत्तेचे दरवाजे उघडण्यासाठी अखिलेश यादव प्रयत्न करण्याची शक्यता आहे. अखिलेश यादव, शरद पवार या दोघांचेही नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याशी चांगले संबंध आहेत. शरद पवारांनी आजच्या बैठकीनंतर पुढची रणनीती ठरविण्याचे म्हटले आहे. यामुळे भाजपाच्या कधीकाळी विरोधक असलेल्या नितीश आणि चंद्राबाबुंना आपल्याकडे वळविण्यासाठी अखिलेश आणि पवारांची ताकद वापरली जाण्याची शक्यता आहे. 

नितीशकुमार यांचे राजकारण समाजवादी राहिले आहे. या चळवळीतून पुढे आलेल्या नितीशकुमारांचे सपाचे संस्थापक मुलायम सिंहांसोबत जवळचे संबंध होते. इंडिया आघाडीची स्थापनाच नितीशकुमार यांच्या प्रयत्नांतून झाली होती. याला अखिलेश आणि शरद पवारांचा पाठिंबा होता. या नितीशकुमारांना पुन्हा इंडी आघाडीत आणण्यासाठी अखिलेश यादव मोठ्या भूमिकेत दिसणार आहेत.

2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी चंद्राबाबू नायडू यांनी अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. त्यावेळी चंद्राबाबू नायडू बिगर-काँग्रेस, बिगर भाजप तिसरी आघाडी स्थापन करण्याचा विचार करत होते. चंद्राबाबू नायडू यांनी 2019 मध्ये लखनौ दौऱ्यात अखिलेश आणि मायावती यांची भेट घेतली होती. त्यांना यश आले नाही तरी त्यांच्यामुळे अखिलेश आणि मायावती एकत्र निवडणूक रिंगणात उतरले होते. चंद्राबाबूंचा शब्द तेव्हा अखिलेश यांनी पाळला होता. हे संबंध अखिलेश यांना चंद्राबाबुंशी चर्चा करण्यासाठी आणि त्यांचे मन वळविण्यासाठी उपयोगी ठरण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालAkhilesh Yadavअखिलेश यादवNitish Kumarनितीश कुमारChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४