शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भाजपासमोर आणखी एक संकट; सरकार बनवण्यापूर्वीच घटक पक्षांच्या मागणीनं टेन्शन वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 17:58 IST

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता दिल्लीत सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर आता दिल्लीत सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी एनडीए असो वा विरोधी इंडिया आघाडीची राजधानीत बैठक सुरू आहेत. त्यात एनडीए सरकार आजच सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याचं बोललं जातं. ८ जून रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. मात्र नवीन सरकार स्थापनेपूर्वी एनडीएच्या घटक पक्षांच्या मागण्या वाढल्या आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, नीतीश कुमार यांच्या जेडीयूने ४ केंदीय मंत्रालयाची मागणी केली आहे. तर चिराग पासवान यांनी २, जीतनराम मांझी यांनी १ आणि टीडीपीनेही ४ मंत्रालयाची मागणी केली आहे. लोकसभा निकालात भाजपा प्रणित एनडीएला बहुमत मिळालं परंतु भाजपाला स्वबळावर २४० जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे बहुमतासाठी घटक पक्षांची गरज भाजपाला लागणार आहे. अशावेळी घटक पक्षांनी नव्या सरकारमध्ये अधिकच्या मंत्रालयाची मागणी केली आहे. 

आज एनडीएची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीला तेलुगु देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू, जेडीयू नेते बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार, शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकजनशक्ती पार्टीचे चिराग पासवान यासह इतर नेते हजर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपाला २४० जागा जिंकता आल्या. तर टीडीपी १६, जेडीयू १२, शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला ७, चिराग पासवान यांना ५ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे नव्या सरकार स्थापनेत घटक पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळेच घटक पक्षांची मागणी वाढली आहे. 

सर्वात मोठा पक्ष पण आनंद नाही...

लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपानं सर्वाधिक २४० जागा जिंकल्या, सर्वात मोठा पक्ष बनला परंतु भाजपामध्ये आनंदाचं वातावरण नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे भाजपा पक्षाच्या जागा बहुमतापासून दूर आहेत. एक्झिट पोलचे आकडे पाहून भाजपा नेत्यांना २०१९ प्रमाणेच २०२४ मध्येही प्रचंड बहुमत मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु विरोधी इंडिया आघाडीने त्यांच्या स्वप्नावर पाणी टाकलं. सर्वात मोठा फटका भाजपाला उत्तर प्रदेशात बसला. त्याठिकाणी केवळ ३३ जागांवर भाजपाला समाधान मानावं लागलं. मागील निवडणुकीत इथं ६२ जागांवर भाजपा विजयी झाली होती. भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएकडे बहुमत असल्याने नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनू शकतील परंतु या सरकारमध्ये प्रादेशिक घटक पक्षांचं महत्त्व वाढलेलं आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूNitish Kumarनितीश कुमारNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी