शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

आम्ही आरक्षणाला हात लावला नाही, कुणाला लावूही देणार नाही, अमित शाहंचे काँग्रेसवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 17:34 IST

'बहुमताचा सर्वाधिक गैरवापर काँग्रेसने केला, ही त्यांचीच परंपरा आहे.

Lok Sabha Election : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज(दि.19) गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. 'विरोधकांचे आरोप बिनबुडाचे आहेत, आम्ही आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. बहुमताचा दुरुपयोग करण्याची परंपरा काँग्रेसचीच आहे. आणीबाणी लादण्यासाठी आणि लोकशाहीचा गळा घोटण्यासाठी इंदिरा गांधींनी बहुमताचा गैरवापर केला होता, असा घणाघात

संविधान बदलण्याचा विचार केला नाहीभाजपवर राज्यघटना बदलल्याचा आरोप काँग्रेस वारंवार करत आहे. त्यावर अमित शाह म्हणाले की, भाजप हे कधीही करणार नाही आणि कोणालाही करू देणार नाही. विरोधक संविधान बदलण्याचा मुद्दा आरक्षणाशी जोडून मांडत आहेत. पण मला हे स्पष्ट करायचे आहे की, 2014 आणि 2019 मध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळाले. नरेंद्र मोदी गेल्या 10 वर्षांपासून पूर्ण बहुमताने राज्य करत आहेत. आम्ही कधीच संविधान बदलण्याचा विचार केला नाही. 

आरक्षणाशी आम्ही कधीही छेडछाड करणार नाही...आम्ही आरक्षणाशी कधीही छेडछाड करणार नाही आणि आम्ही कोणालाही तसे करू देणार नाही. ही आमची देशातील जनतेशी बांधिलकी आहे. नरेंद्र मोदींनी मागास समाज, दलित समाज आणि आदिवासींच्या कल्याणाला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. आम्ही आमच्या बहुमताचा वापर कलम 370 काढून टाकण्यासाठी, तिहेरी तलाक रद्द करून मुस्लीम महिलांना न्याय देण्यासाठी आणि CAA द्वारे पीडित लोकांना न्याय देण्यासाठी केला.

इंदिरा गांधींनी बहुमताचा गैरवापर केलाकाँग्रेसवर हल्लाबोल करताना अमित शाह म्हणाले की, बहुमताचा गैरवापर करण्याची परंपरा काँग्रेसचीच आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणी लादण्यासाठी आणि लोकशाहीचा गळा घोटण्यासाठी बहुमताचा गैरवापर केला. देशातील महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे, त्यामुळे विरोधकांनी असे आरोप केले तरी, देशातील जनता फसणार नाही. 

ईव्हीएम छेडछाड आणि इलेक्टोरल बाँड्सचा मुद्दाही विरोधक आजकाल मोठ्या प्रमाणात उचलत आहेत. यावर अमित शहा म्हणाले, त्यांच्या पक्षानेही इलेक्टोरल बाँड्स घेतले आहेत, त्यामुळे ही खंडणीच नाही का? ते ज्या ज्या राज्यांमध्ये सत्तेत होते, त्यांनीही इलेक्टोरल बॉण्ड्सच्या माध्यमातून पैसे घेतले आहेत. काँग्रेसला 9,000 कोटी रुपये मिळाले, तर भाजपला 6,600 कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळेच विरोधक बिनबुडाचे आरोप करत आहेत, असेही अमित शाह यावेळी म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस