शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

भाजप सोडताना अडवणींच्या डोळ्यात आश्रू; पण त्यांनी रोखले नाही : शत्रुघ्न सिन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 11:35 IST

दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचा काळ आणि आजची स्थितीत यात मोठा फरक आहे. त्यावेळी देशात लोकशाही होती, परंतु आज हुकूमशाही निर्माण झाल्याची टीका सिन्हा यांनी केली.

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्ष सोडण्याचा आपला निर्णय जेंव्हा ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना समजला, त्यावेळी त्यांच्या डोळ्यात आश्रू आले होते, अशी माहिती भाजपमधून काँग्रेसमध्ये सामील झालेले शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

नवीन इनिंगची सुरुवात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वप्रथम मी अडवाणी यांचे आशिर्वाद घेतले. त्यांनी मला पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी ते भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यात आश्रू आले होते. परंतु, त्यांनी मला रोखले नाही. ठिक आहे, आपला स्नेह कायम राहिल असंही अडवाणींनी म्हटल्याचे सिन्हा यांनी सांगितले.

दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचा काळ आणि आजची स्थितीत यात मोठा फरक आहे. त्यावेळी देशात लोकशाही होती, परंतु आज हुकूमशाही निर्माण झाल्याची टीका सिन्हा यांनी केली. तसेच भाजपमधील वरिष्ठ नेत्यांना योग्य वागणूक मिळत नाही. अडवणी भाजपच्या संस्थापकांपैकी एक आहेत. मात्र भाजपने त्यांनाच तिकीट नाकरले. पक्षाने गांधीनगर येथून पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे.

२०१९ लोकसभा निवडणुकीत बालाकोट एअर स्ट्राईकमुळे निवडणुकीच्या निकालावर परिणाम होईल का, या संदर्भात सिन्हा यांना विचारण्यात आले. त्यावर सिन्हा म्हणाले, देशातील प्रत्येक व्यक्ती देशभक्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर बेरोजगारीचा मुद्दा काढल्यास ते पुलवामाची आठवण करून देतात. जनतेच्या मुख्य प्रश्नांकडे मोदी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे २३ मे नंतर ते पंतप्रधान राहणार नाहीत. ममता बॅनर्जी यांनी मोदींनी 'एक्सपायरी पीएम' म्हटले आहे. ही उपाधी त्यांच्यासाठी योग्यच आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर त्यांना आपली झोळी उचलून निघावे लागणार, अशी टीकाही सिन्हा यांनी केली.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीShatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी