शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

असुरक्षिततेची भावना असल्यानेच मोदी माझा द्वेष करतात - राहुल गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 17:39 IST

मोदींचा माझ्यावरील क्रोध फक्त त्यांच्या स्वत:ची असुरक्षिततेची आणि भीतीची भावना असल्यामुळे आहे असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे

नवी दिल्ली -  माझ्यावर वैयक्तिक टीका करणे, पप्पू म्हणून चिडवणे हे सगळे भाजपाचा माझ्यावरील क्रोध, राग आणि निराशादायी भावनेतून होत असते. पण त्यांच्या रागाला मी रागानेच उत्तर द्यावं यावर माझा विश्वास नाही. रागाने राग काढू शकत नाही, मी पंतप्रधानांचा आभारी आहे. त्यांनी मला खूप काही शिकवले आहे. विशेषकरून सहनशीलता. तुम्हाला कोणी शिकविणारा असेल तर तुम्ही त्याचा तिरस्कार कसा करू शकता? पंतप्रधान माझा द्वेष करु शकतात, पण माझ्या हृदयात केवळ त्याच्याबद्दल प्रेम आहे कारण मला माहिती आहे की, मोदींचा माझ्यावरील क्रोध फक्त त्यांच्या स्वत:ची असुरक्षिततेची आणि भीतीची भावना असल्यामुळे आहे असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे. द टेलिग्राफ या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत राहुल यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली आहे.

राहुल गांधी यांनी या मुलाखतीत मोदींवर टीकेच लक्ष्य केलं आहे. या मुलाखतीत राहुल गांधी यांनी म्हटलं की, राजकारणात असलेल्या व्यक्तींनी जनतेस सशक्त करण्यासाठी स्वत:ची शक्ती वापरली पाहिजे. विशेषत समाजातील ज्या घटकांचे आवाज दाबले जात आहेत त्यांना सशक्त केले पाहिजे. भविष्यात काँग्रेसचं नेतृत्व करणाऱ्या युवा पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच आमच्या वरिष्ठ नेत्यांची मदत झाली आहे. राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक पातळीवर संघटना मजबूत करण्यासाठी सर्व नेते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आमच्या पक्षात कुठेही वरिष्ठ आणि नवीन पिढीमध्ये संघर्ष नाही असा दावा राहुल गांधी यांनी केला. 

आगामी लोकसभा निवडणूक ही सत्तेसाठी नाही तर देशाच्या रक्षणासाठी आहे. अर्थव्यवस्थेची दयनीय अवस्था, कृषी संकट आणि मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी सामना आणि महत्त्वाचं म्हणजे धर्मनिरपेक्षता, विविधता आणि बहुलवाद यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आमची लढाई आहे.  सुप्रीम कोर्ट, आरबीआय आणि सीबीआयसारख्या स्वायत्त संस्थांवर यांच्यावर एक प्रकारचा दबाव आहे. जे अधिकारी आरएसएसच्या नियमांचे उल्लंघन करतील किंवा त्यांच्या धोरणावर टीका करतील अशा अधिकाऱ्यांना काढून टाकले जाते. सीबीआय संचालकांना मध्यरात्री पदावरुन हटविण्यात आलं. न्यायालयीन प्रक्रिया आणि निर्णय कसे हाताळले जात आहेत याबद्दल चार न्यायाधीशांद्वारे आयोजित पत्रकार परिषद अवघ्या देशाने पाहिली आहे असं राहुल गांधी यांनी मुलाखतीत सांगितले. 

संपूर्ण भारतामध्ये लोक मोदींबद्दल नाराज आणि क्रोधित आहेत. लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी मोदी राष्ट्रवाद, देशभक्ती सारख्या शब्दाचा प्रचारात वापर करत आहे. मात्र देशाचे लोक मुर्ख नाही त्यांना माहीत आहे की यांच्याकडून आपण फसवले जाणार आहोत अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

 उत्तर प्रदेशातील आघाडीबाबत काय वाटतं राहुल गांधींना ?उत्तर प्रदेशात आम्ही आशावादी होतो. पण एसपी-बीएसपीला वाटले की त्यांनी एकटे जावे. मात्र जर एसपी-बीएसपी-काँग्रेसची आघाडी झाली असती भाजपासाठी ही आघाडी विनाशकारी ठरली असती असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.   

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा