शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

लोकसभा निकालापूर्वीच मध्य प्रदेशात मायावती 'किंगमेकर'च्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 18:00 IST

भारतीय जनता पक्ष आमदार खरेदीसाठी प्रयत्न करणार नाही. परंतु, काँग्रेसचे आमदारच भाजपमध्ये येऊ इच्छितात. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेसने विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी भार्गव यांनी केली आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठीच्या एक्झिट पोलमध्ये केंद्रातील भाजपप्रणीत एनडीएला बहुमत दाखविण्यात आले आहे. असं असले तरी विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. केंद्रातील सत्तेसाठी सर्वांच्या हालचाली असताना मध्य प्रदेशात मात्र चित्र वेगळ असून येथे बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती किंगमेकर म्हणून समोर येत आहेत.

मध्य प्रदेशात विरोधात असलेल्या भाजपचे नेते गोपाल भार्गव यांनी राज्यपालांना पत्र पाठवून विधानसभेचे सत्र बोलविण्याची मागणी केली आहे. भारतीय जनता पक्षाला ज्या प्रमाणे देशात आणि राज्यात पाठिंबा मिळत आहे, त्यामुळे अनेक काँग्रेस आमदार भाजपमध्ये सामील होण्यास इच्छूक आहेत. भारतीय जनता पक्ष आमदार खरेदीसाठी प्रयत्न करणार नाही. परंतु, काँग्रेसचे आमदारच भाजपमध्ये येऊ इच्छितात. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेसने विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी भार्गव यांनी केली आहे.

२०१८ मध्ये झालेल्या २३० विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेसला ११४ जागा मिळाल्या होत्या. केवळ दोन जागा कमी पडल्यामुळे काँग्रेस बहुमतापासून दूर आहे. तर भाजपला १०९ जागा मिळाल्या होत्या. भाजपला सत्तेसाठी ७ जागांची आवश्यकता होती. या निवडणुकीत बसपाचे दोन, सपाचा एक आणि चार अपक्ष आमदार निवडून आले होते. सपा-बसपाने आधीच काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यानंतर अपक्ष आमदारांनी देखील काँग्रेसला पाठिंबा दिला होता. मात्र मध्य प्रदेशात अपक्षांच्या पाठिंब्या व्यतिरिक्त बसपाचा पाठिंबा काँग्रेससाठी महत्त्वाचा आहे.

दरम्यान भाजपकडे मध्य प्रदेशात सरकार स्थापनेसाठी दोन मार्ग आहेत. एक म्हणजे, बसपा-सपा यांच्यासह चार अपक्षांचा भाजपला पाठिंबा मिळवणे आणि दुसरा म्हणजे काँग्रेसच्या काही आमदारांना आपल्या सोबत घेऊन सत्तास्थापनेचा दावा करणे. अशा स्थितीत मायावती काँग्रेससाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत. मायावती यांच्या दोन आमदारांच्या मदतीने काँग्रेसची सत्ता कायम राहणार आहे.

मायावतींचा नकार

लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनुसार भाजपला बहुमत दाखविण्यात आले आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बैठक बोलविली होती. त्या बैठकीला मायावती यांना आमंत्रीत करण्यात आले होते. मात्र मायावती यांनी बैठकीला उपस्थित राहण्यासंदर्भात काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे काँग्रेससाठी लोकसभेसह मध्य प्रदेशातील पेच आणखीनच जटील होण्याची शक्यता आहे.

 

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९mayawatiमायावतीcongressकाँग्रेसBJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेश