शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

विरोधकांच्या तक्रारी असताना माजी राष्ट्रपतींकडून निवडणूक आयोगाचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 12:02 IST

नियुक्त करण्यात आलेले आयुक्त उत्तम काम करत आहेत. तुम्ही त्यांच्यावर टीका करू शकत नाहीत. निवडणुकीचे काम योग्य दिशेने झाल्याचे मुखर्जी यांनी म्हटले.

नवी दिल्ली - देशातील लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून निवडणूक आयोगावर अनेकदा पक्षपातीपणा केल्याचे आरोप करण्यात आला आहेत. तर अनेकदा सत्ताधाऱ्यांना सॉफ्ट कॉर्नर दिल्याचे आरोप झाले. मात्र माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी २०१९ मधील लोकसभा निवडणूक अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडल्याबद्दल निवडणूक आयोगाच्या कामाचे कौतुक केले आहे. दिल्लीतील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

देशाचे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांच्यापासून सध्याच्या निवडणूक आयुक्तांच्या चांगल्या कामामुळे निवडणूक आयोगाने चांगले काम केले. नियुक्त करण्यात आलेले आयुक्त उत्तम काम करत आहेत. तुम्ही त्यांच्यावर टीका करू शकत नाहीत. निवडणुकीचे काम योग्य दिशेने झाल्याचे मुखर्जी यांनी म्हटले. मुखर्जी यांचे हे वक्तव्य अशावेळी आले जेंव्हा विरोधकांकडून निवडणूक आयोगाच्या कामावर टीका करण्यात येत आहे. देशाचे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांच्यापासून आताच्या निवडणूक आयुक्तांनी उत्तम काम केल्यामुळेच लोकशाही सुरक्षीत राहिली असल्याची पुष्टी यावेळी माजी राष्ट्रपतींनी जोडली.

मुखर्जी यांच्या वक्तव्याच्या एक दिवस आधीच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग पक्षपात करत असल्याचा आरोप केला होता. राहुल यांनी ट्विट करून म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर निवडणूक आयोगाने लोटांगण घेतले असून निवडणूक आयोग पूर्वीसारखे निष्पक्ष राहिले नसल्याचे त्यांनी नमूद केले होते.

निवडणूक आयोग पंतप्रधान मोदींच्या बाजुने असल्याचा आरोप विरोधक करत होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा आचारसंहितेचे उल्लंघन केल्यानंतर देखील त्यांनी क्लीनचीट देण्यात आले होते. त्यावर निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर त्यांनी आयोगाच्या बैठकीत सामील होण्यास नकार दर्शविला होता, असंही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस