शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

5 न्याय अन् 25 गॅरंटी; काँग्रेस आज निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 08:26 IST

Lok Sabha Elections 2024 : जयपूर आणि हैदराबादमध्ये जाहीरनाम्याशी संबंधित जाहीर सभा आयोजित केल्या जातील, ज्यामध्ये पक्षाचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत.

नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष आज आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. काँग्रेसचा हा जाहीरनामा पाच 'न्याय' आणि 25 'गॅरंटी'वर आधारित असणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी पक्षाच्या मुख्यालयात हा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. तसेच, 6 एप्रिल रोजी जयपूर आणि हैदराबादमध्ये जाहीरनाम्याशी संबंधित जाहीर सभा आयोजित केल्या जातील, ज्यामध्ये पक्षाचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत.

काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा जयपूरमध्ये आयोजित जाहीरनामा-संबंधित रॅलीला संबोधित करतील. राहुल गांधी हैदराबादमध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, सामायिक न्याय, किसान न्याय, महिला न्याय, श्रमिक न्याय आणि युवा न्याय या पाच तत्त्वांवर पक्षाचा जाहीरनामा आधारित असणार आहे. 

'युवा न्याय' अंतर्गत पक्षाने ज्या पाच गॅरंटीची चर्चा केली आहे. त्यामध्ये 30 लाख सरकारी नोकऱ्या आणि तरुणांना एक वर्षासाठी प्रशिक्षणार्थी कार्यक्रमांतर्गत 1 लाख रुपये देण्याच्या आश्वासनांचा समावेश आहे. पक्षाने 'सामायिक न्याय' अंतर्गत जात जनगणना करण्याची आणि आरक्षणाची 50 टक्के मर्यादा रद्द करण्याची गॅरंटी दिली आहे. तसेच, 'किसान न्याय' अंतर्गत, पक्षाने किमान आधारभूत किंमत (MSP), कर्जमाफी आयोगाची स्थापना आणि जीएसटी मुक्त शेतीला कायदेशीर दर्जा देण्याचे आश्वासन दिले आहे. 

याचबरोबर, 'श्रमिक न्याय' अंतर्गत काँग्रेसने कामगारांना आरोग्याचा अधिकार, किमान वेतन 400 रुपये प्रतिदिन आणि शहरी रोजगार हमी देण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय, 'महिला न्याय' अंतर्गत 'महालक्ष्मी' गॅरंटीद्वारे गरीब कुटुंबातील महिलांना वर्षाला एक लाख रुपये देण्यासह अनेक आश्वासने दिली आहेत.

भाजपाचा वचननामा पुढील आठवड्यात?भाजपाते वचननाम्याच्या समितीची दुसरी बैठक गुरुवारी होत असून 'मोदी की गॅरंटी'चा सविस्तर तपशील तयार केला जात असल्याचे समजते. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह या समितीचे प्रमुख असून पहिल्या बैठकीमध्ये देशभरातून आलेल्या हजारो सूचनांवर चर्चा करण्यात आली. भाजपाच्या वचननाम्यात 'विकसित भारता'वर अधिक भर देण्यात आला असून शेतकऱ्यांसाठी मोठी आश्वासने दिली जाऊ शकतात.

टॅग्स :congressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४