शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

"...तर पाकिस्तानला सहकार्य करण्यास भारत तयार", संरक्षणमंत्र्यांनी शेजारील देशांना ठणकावले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 13:55 IST

भारतावर वाईट नजर ठेवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे शब्दांत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शेजारी देश चीन आणि पाकिस्तानला ठणकावले आहे.

देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशा परिस्थितीत भारतावर वाईट नजर ठेवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे शब्दांत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शेजारी देश चीन आणि पाकिस्तानला ठणकावले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत असताना भारताची एक इंच जमीन सुद्धा चीन काबीज करू शकत नाही, तर पाकिस्तानला दहशतवादाचा फटका सहन करावा लागेल, असे राजनाथ सिंह म्हणाले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, "मित्र जीवनात बदलू शकतात, शेजारी नाही. पीओके आमचा होता, आमचा आहे आणि राहील. जर पाकिस्तानला वाटत असेल की तो दहशतवादावर नियंत्रण ठेवण्यास असमर्थ आहे. तर भारत सहकार्य करण्यास तयार आहे. दहशतवाद रोखण्यासाठी पाकिस्तानला भारत सहकार्य करण्यास तयार आहे. पाकिस्तानला दहशतवादाचा फटका सहन करावा लागेल."

याआधी बुधवारी राजनाथ सिंह यांनी संभलमधील एका जाहीर सभेला संबोधित करताना म्हटले होते की, यावेळी देश सुरक्षित हातात आहे आणि देशातील जनतेने काळजी करण्याची गरज नाही. तसेच जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्याचा संदर्भ देत ते म्हणाले की, भाजपाने जेव्हापासून कलम 370 रद्द करण्याचे काम केले आहे, तेव्हापासून तेथे फुटीरतावाद नाही किंवा दगडफेक झाली नाही. काश्मीरमध्ये शांतता आहे. पीओकेचे लोक आम्हाला काश्मीरचा भाग बनवा असे म्हणू शकतात, हे देखील शक्य आहे.

दरम्यान, अरुणाचल प्रदेशातील अनेक ठिकाणांची नावे चीनने बदलली आहेत. याबाबत राजनाथ सिंह म्हणाले की, एखाद्या गोष्टीचे नाव बदलल्याने त्या वस्तूवरील अधिकार बदलू शकत नाहीत. भारताने चिनी ठिकाणांची नावे बदलली तर ती ठिकाणे भारताची होतील का? असा सवाल करत चीनची अशी पावले जमिनीवरील वास्तव बदलू शकत नाहीत, असे राजनाथ सिंह म्हणाले.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Pakistanपाकिस्तानchinaचीनIndiaभारत