शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
4
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
5
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
6
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
7
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
8
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
9
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
10
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
11
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
12
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
13
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
14
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
15
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
16
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
17
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
18
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
19
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
20
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू

"400 पारचा संकल्प अवघड"; भाजपाच्या दिग्गज नेत्याने मोदींना लिहिलं पत्र, यावर घेतला आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 09:12 IST

Lok Sabha Elections 2024 And Narendra Modi : भाजपाचे उमेदवार रमेश अवस्थी यांना तिकीट मिळाल्यापासून ते चर्चेत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हे नाव नवीन आहे. त्यानंतर त्यांच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. कानपूर लोकसभा जागेवर चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे, मात्र या जागेवर भाजपामधील लढत कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. भाजपाने कानपूरच्या जागेवर रमेश अवस्थी हा नवा चेहरा दिला आहे, मात्र या नावाबाबत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

भाजपाचे उमेदवार रमेश अवस्थी यांना तिकीट मिळाल्यापासून ते चर्चेत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हे नाव नवीन आहे. त्यानंतर त्यांच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत कानपूरमधील भाजपाचे माजी उपाध्यक्ष, वीएचपीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि बजरंग दलाचे माजी राष्ट्रीय संयोजक, ज्येष्ठ नेते प्रकाश शर्मा यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून कानपूरमधील उमेदवाराच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, 400 पारचा संकल्प पूर्ण करणं अवघड आहे.

कोण आहेत प्रकाश शर्मा?

कानपूरच्या दिग्गज नेत्यांमध्ये प्रकाश शर्मा यांच्या नावाचा समावेश आहे. आतापर्यंत त्यांनी भाजपा, वीएचपी, बजरंग दल अशा अनेक मोठ्या संघटनांमध्ये वरिष्ठ पदांवर काम केले आहे. शहराच्या राजकारणाबरोबरच राज्याच्या राजकारणातही त्यांचा सहभाग आहे, मात्र कानपूर मतदारसंघासाठी उमेदवार रमेश अवस्थी यांच्या निवडीबाबत आणि निवडणूक लढवल्यावर होणाऱ्या नुकसानाबाबत भाजपाने पंतप्रधानांना पत्र लिहिल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. 

पंतप्रधानांना लिहिलेलं हे पत्र व्हायरल झालं असून, त्यात कानपूरची भूमी क्रांतिकारकांची भूमी असल्याचं म्हटलं आहे. "या भूमीतून जनसंघ आणि भाजपासाठी मैदान तयार करण्यात आलं आहे. येथे पक्षाने असा उमेदवार उभा केला आहे ज्याची ओळख कार्यकर्त्यांमध्येही नाही. रमेश अवस्थी यांनी भाजपाचे सदस्यत्व कधी घेतले आणि पक्षासाठी काय योगदान दिले, याची माहितीही येथील कार्यकर्त्यांना व नेत्यांना नाही."

"कानपूरची भूमी कार्यकर्ता विरहित झाली आहे का? पक्षाचे कार्यकर्ते निराश झाले असून ते अंतर्गत धुमाकूळ घालत आहेत. असेच चालू राहिले तर पंतप्रधानजी, तुमचा 400 पारचा संकल्प अपूर्णच राहील" असं पत्रात म्हटलं आहे. कानपूर मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार रमेश अवस्थी हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य उपस्थित राहणार आहेत. पण, त्याआधीच या पत्रावरून वाद सुरू झाला असून भाजपाच्या अडचणी वाढल्या आहेत.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारण