शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 15:38 IST

Lok Sabha Elections 2024 And Rahul Gandhi : इंडिया आघाडीचे सरकार आल्यास आम्ही महालक्ष्मी योजना लागू करू असं राहुल गांधी यांनी सांगितलं आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी 30 एप्रिल रोजी मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात पोहोचले. इंडिया आघाडीचे सरकार आल्यास आम्ही महालक्ष्मी योजना लागू करू, असं त्यांनी सांगितलं आहे. "आम्ही गरीब कुटुंबांची यादी तयार करू. प्रत्येक कुटुंबातील एका महिलेच्या बँक खात्यात वर्षाला एक लाख रुपये जमा केले जातील. जेव्हा महिला सकाळी उठतील तेव्हा जादुने हे पैसे त्यांच्या खात्यात येतील" असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. 

राहुल गांधी यांनी संविधान हातात घेऊन हा जनतेचा आत्मा आहे. मला या सरकारला विचारायचं आहे की, आरक्षणाच्या विरोधात अग्निवीर योजनेचं खासगीकरण का केलं गेलं?, मला विचारायचे आहे की, किती शेतकऱ्यांची कर्ज माफ झाली?, किती मजुरांची कर्ज माफ झाली? असंही म्हटलं आहे. अयोध्येतील प्रभू राम मंदिराबाबत राहुल म्हणाले की, "मंदिराच्या बांधकामाच्या वेळी बॉलिवूड कलाकार होते. पण देशातील एकही शेतकरी, गरीब मजूर किंवा दलित-मागासवर्गीय व्यक्ती दिसली नाही."

"राम मंदिर आणि संसदेच्या पायाभरणी समारंभाला आदिवासी राष्ट्रपतींना निमंत्रित करण्यात आले नव्हते. नोटाबंदी आणि जीएसटीची चुकीची अंमलबजावणी केली. त्यामुळेच आज देशात महागाईचा दर सर्वाधिक आहे. देशात महिलाही दिवसाचे आठ तास मजुरी करतात. मात्र इंडिया आघाडी सरकार पहिल्यांदाच महिलांना घरात काम करण्याचे पैसे देणार आहे."

"आम्ही तरुणांसाठीही वेगळी योजना आणू. मोठ्या उद्योगपतींची मुलं कंपन्यांमध्ये जाऊन अप्रेंटिसचं शिक्षण घेतात. ते सहा महिने काम करतात, वर्षभर काम करतात आणि त्यांना चांगले पैसे मिळतात. ते प्रशिक्षण घेतात. त्यानंतर त्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळते. इंडिया आघाडी सरकार हे जगातील पहिले सरकार असेल जे प्रत्येक ग्रॅज्युएटला अप्रेंटिसशिपचा अधिकार देईल."

"आम्ही खासगी क्षेत्रातही कायमस्वरूपी नोकऱ्यांची व्यवस्था करू. त्यांना खासगी नोकरीतही पेन्शन मिळेल. तरुणांना BHEL, इंडियन ऑइल सारख्या कंपन्यांमध्ये, सरकारी कार्यालयात, सरकारी रुग्णालयांमध्ये, सरकारी महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये एक वर्षाच्या कायमस्वरूपी नोकऱ्या मिळतील. प्रशिक्षण मिळेल" असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसMONEYपैसा