शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

राम मंदिर नव्हे, या मुद्यांवर मतदान करणार जनता; सर्व्हेचे आकडे भाजपचं टेन्शन वाढवणारे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 12:43 IST

CSDS-Lokniti Pre-Poll Survey: सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या मुद्द्यावर मोठ्या बहुमतासह सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार बनेल, अशी आशा आहे. यातच एक सर्व्हे भाजपचे टेन्शन वाढवणारा ठरू शकतो.

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणूक 2024 मध्ये अयोध्येतील राम मंदिरापेक्षाही देशातील अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्दे अधिक महत्वाचे ठरण्याची शक्यता आहे. मतदार या मुद्द्यावर मतदान करू शकतात. यातच विरोधीपक्षाने बेरोजगारी आणि महागाईचा मुद्दा उचलून धरला आहे. मात्र सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या मुद्द्यावर मोठ्या बहुमतासह सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार बनेल, अशी आशा आहे. यातच एक सर्व्हे भाजपचे टेन्शन वाढवणारा ठरू शकतो.

बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार आणि बिघडती आर्थिक परिस्थिती मतदारांसाठी महत्वाची आहे आणि याच मुद्द्यांवर ते मतदान करू शकतात, असे सीडीएस लोकनीती प्री पोल सर्व्हेमधून समोर आले आहे. गरीब-मध्यमवर्गावर अधिक परिणाम - अर्थव्यवस्थेत होत असलेल्या बदलांचा सर्वाधिक परिणाम हा गरीब आणि मध्यमवर्गावर होत आहे. श्रीमंत वर्गावर याचा फारसा परिणाम होत नाही. देशाची अर्थव्यवस्था योग्य मार्गावर अहे, असे निर्देशांकांतून दिसत असले तरी, मतदारांवर मात्र त्याचा परिणाम जाणवत आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी दोन तृतीयांश पेक्षाही अधिक लोकांनी, पूर्वीच्या तुलनेत आता नोकरी मिळणे अधिक कठीण झाले आहे आणि ही संख्या शहरी पुरुषांमध्ये अधिक आहे, असे म्हटले आहे. तर तीन चतुर्थांश लोक बेरोजगारीसाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचे म्हणत आहेत.

गरिबांना होतोय त्रास - गेल्या 5 वर्षांत महागाई वाढली आहे, असे दोन तृतीयांश लोकांना वाटते. ग्रामीण भागातील गरीब लोकांना याचा अधिक फटका बसत आहे. तर शहरातील मध्यमवर्गीय आणि श्रीमंत वर्गावर याचा फारसा परिणाम नाही. वाढत्या महागाईसाठी बहुतांश लोक केंद्र सरकारलाच जबाबदार धरत आहेत. 2019 च्या तुलनेत अधिक लोकांना वाटते की, आता ते आपला खर्च काढल्यानंतर, बचत करू शकतात. मात्र, घर चालवण्यातही अडचणी येत असल्याचे 50 टक्के लोकांना वाटते. 

महत्वाचे म्हणजे, बेरोजगारी आणि महागाई हे आगामी निवडणुकीत सर्वात महत्वाचे मुद्दे असतील, असे तब्बल 50 टक्के लोकांना वाटते. 2019 मध्ये सहा पैकी केवळ एका व्यक्तीलाच हा मुद्दा महत्वाचा वाटत होता. मात्र 2024 मध्ये स्थिती बदलली आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाElectionनिवडणूकRam Mandirराम मंदिरInflationमहागाईUnemploymentबेरोजगारीcongressकाँग्रेस