शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे की शिंदे कोण वरचढ ठरणार? २६ मतदारसंघात थेट लढत; उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर!
2
"यांच्या स्वभावातच कोणाची..."; वांद्रे पूर्वमध्ये उमेदवार देताच ठाकरेंवर झिशान सिद्दीकींची खोचक पोस्ट
3
"काँग्रेसला १०० पेक्षा जास्त जागा मिळतील"; वडेट्टीवारांच्या विधानावर राऊत म्हणाले, "तुम्ही मेरिटवर बोलत असाल तर..."
4
भारताशी पंगा घेणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांची खुर्ची धोक्यात; पक्षाच्या खासदारांनीच मागितला राजीनामा
5
क्रिकेटच्या मैदानात 'बुद्धिबळातील चाल': टॉम लॅथमच्या विकेटसाठी R Ashwin नं असं विणलं जाळं (VIDEO)
6
उमेदवार जाहीर करण्याबाबत महायुतीने घेतली आघाडी; लोकसभा निवडणुकीपासून घेतला बोध!
7
डॉलरची दादागिरी संपुष्टात येणार? भारत-रशिया-चीनने बनवला प्‍लॅन, अमेरिकेच्या सर्वात मोठ्या ताकदीला आव्हान
8
Waaree Energies IPO allotment status: Waaree Energiesचा IPO अलॉट झालाय का? 'इकडे' करू शकता स्टेटस चेक; पैसे दुप्पट होण्याची शक्यता
9
'गजनी २'च्या शूटिंगला लवकरच सुरुवात! आमिर खानसोबत दिसणार साऊथमधील 'हा' मोठा सुपरस्टार
10
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
11
Free LPG Cylinder: दिवाळीपूर्वी केंद्र सरकारनं दिली भेट, १.८४ लाख लाभार्थ्यांना मिळणार मोफत गॅस सिलिंडर
12
IND vs NZ: न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी; टीम इंडियात ३ मोठे बदल, स्टार खेळाडूचं साडेतीन वर्षांनी 'कमबॅक
13
का महाग मिळतं Personal Loan; कार, होम लोनवर का कमी लागतं व्याज? समजून घ्या गणित
14
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
15
कर्तव्यचुकार पोलिसांवर काय कारवाई केलीत? बदलापूर अत्याचार प्रकरणी न्यायालयाची विचारणा
16
"हे जेथे गेले, तेथे अशांतता..."; इंडोनेशियातील लोकांचा रोहिंग्या मुस्लिमांना विरोध, बोटीतून उतरूही दिलं नाही
17
काळवीटाच्या शिकारीनंतर सलमानने बिश्नोई समाजाला दिलेली पैशांची ऑफर? लॉरेन्सच्या भावाचा मोठा खुलासा, म्हणाला...
18
Diwali 2024 लक्ष्मी पूजन ३१ ऑक्टोबर की ०१ नोव्हेंबरला? तारखेबाबत संभ्रम; पाहा, शुभ मुहूर्त
19
सीमेवरील शांततेला प्राधान्य द्यायला हवे; PM मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यक्त केली अपेक्षा
20
सुनियोजित शहरातील बेकायदा बांधकामे वाढू कशी देता? मुंबई उच्च न्यायालयाचे खडे बोल

"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 7:59 PM

Mani Shankar Remarks: काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी 1962 च्या भारत-चीन युद्धाबाबत केलेल्या वक्तव्याने काँग्रेस बॅकफूटवर गेली आहे.

Jairam Ramesh On Mani Shankar Aiyar Remark:काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर (Mani Shankar Aiyar) यांनी चीनच्या भारतावरील आक्रमणाबाबत केलेल्या वक्तव्यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यावरुन भाजप काँग्रेसवर जोरदार टीका करत आहे, तर काँग्रेसने अय्यर यांच्या वक्तव्यापासून पक्षाला दूर ठेवले आहे. आता काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनीदेखील अय्यर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आणि त्यांचा आमचा संबंध नसल्याचे म्हटले.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना जयराम रमेश म्हणाले, "मणिशंकर अय्यर कोण आहेत? ते पक्षाचे अधिकृत प्रवक्ते नाहीत. ते फक्त माजी खासदार, माजी मंत्री आहेत. ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात हवं ते बोलू शकतात, त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. मीडिया, भाजपची ट्रोल आर्मी आणि सोशल मीडिया प्रकरण उचलून धरलंय. आज त्यांचा काँग्रेस पक्षाशी काहीही संबंध नाही. ते काँग्रेस पक्षात आहेत, पण ते खासदारही नाहीत," अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी दिली.

एका एक्स पोस्टमध्ये काँग्रेस सरचिटणीस म्हणतात, मणिशंकर अय्यर यांनी चुकून 'कथित हल्ला' हा शब्द वापरल्याबद्दल बिनशर्त माफी मागितली आहे. यावेळी जयराम रमेश यांनी मणिशंकर अय्यर यांच्या वाढत्या वयाचाही हवाला दिला आणि 20 ऑक्टोबर 1962 रोजी चीनने भारतावर केलेला हल्ला खरा होता, असेही म्हटले. यावेळी त्यांनी भाजपवर चीनला क्लीनचीट दिल्याचा आरोपही केला.  ते म्हणाले, मे 2020 च्या सुरुवातीला लडाखमध्ये चिनी घुसखोरी झाली, ज्यामध्ये आपले 20 सैनिक शहीद झाले. पण, 19 जून 2020 रोजी पंतप्रधान मोदींनी सार्वजनिकरित्या चीनला क्लीन चिट दिली, ज्यामुळे आपली वाटाघाटीची स्थिती कमकुवत झाली आणि त्यामुळेच डेपसांग आणि डेमचोकसह 2000 चौरस किमी क्षेत्र भारतीय सैन्याच्या कक्षेबाहेर गेले, असा दावाही त्यांनी केला.

भाजपची जोरदार टीकाभाजपचे आयटी विभाग प्रमुख अमित मालवीय यांनी अय्यर यांच्या वक्तव्यावर काँग्रेसवर टीका केली. त्यांनी पोस्ट केले की, "हा 'सुधारणावाद'चा निर्लज्ज प्रयत्न आहे. नेहरुंनी चीनच्या बाजूने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताचा दावा सोडला, राहुल गांधींनी गुप्त सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली, राजीव गांधी फाऊंडेशनने चिनी दूतावासाकडून पैसे घेतले आणि चीनी कंपन्यांसोबत काम केले. सोनिया गांधींच्या यूपीएने भारतीय बाजारपेठ चिनी वस्तूंसाठी खुली केली, ज्यामुळे एमएसएमईला धक्का बसला आणि आता काँग्रेस नेते अय्यर यांना चीनच्या आक्रमणाचा पुरस्कार करत आहेत. तेव्हापासून चीनने बेकायदेशीरपणे 38,000 चौरस किलोमीटर भारतीय भूभागावर कब्जा केला. यातून काँग्रेसचे चीनी प्रेम दिसते," अशी टीका त्यांनी केली.

काय आहे प्रकरण ?काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी 'नेहरुज फर्स्ट रिक्रुट्स' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना 1962 च्या युद्धाबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्यामुळे भाजपकडून काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 1962 मध्ये चीनने भारतावर 'कथित' हल्ला केला होता, असे अय्यर म्हणाले. 'कथित' या शब्दाचा वापर केल्यामुळे अय्यर आणि काँग्रेस भाजपच्या निशाण्यावर आले. पण, वाद वाढल्यानंतर त्यांनी निवेदन जारी करुन माफीदेखील मागितली. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसMani Shankar Aiyarमणिशंकर अय्यरRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा