शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

लोकमत विश्लेषण: काँग्रेसचे उदयपूरचे चिंतन शिबिर; शस्त्रक्रिया झाली यशस्वी, परंतु रुग्ण दगावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 06:17 IST

२०२४ मधील लोकसभा निवडणूक कोणाच्या नेतृत्वाखाली लढविली जाईल? हा संदेश देण्यात काँग्रेस अपयशी ठरली.

आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : ‘भारत जोडो’  या घोषणेने उदयपूरमधील काँग्रेसच्या नव संकल्प शिबिराचा समारोप झाला. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे काँग्रेसने आत्मचिंतन करण्यासाठी  चिंतन शिबिर आयोजित केले होते. शिबिरात मांडण्यात आलेले सर्व ठराव संमत करण्यात आले असले, तरी  काही प्रश्न अनुत्तरित आहेत.

काँग्रेसमध्ये नेतृत्वाबाबत अजूनही स्पष्ट संदेश नाही. ऑगस्टमध्ये संघटनात्मक निवडणूक होईल, तेव्हा २०२४ मधील लोकसभा निवडणूक  कोणाच्या नेतृत्वाखाली लढविली जाईल? हा संदेश उदयपूरमध्ये देण्यात काँग्रेस अपयशी ठरली.

यामागचे कारण हे की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसकडे पूर्णवेळ अध्यक्ष नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबादारी स्वीकारून राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून  सोनिया गांधी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

पक्षाचे नेतृत्व कोण करणार? याबाबत चिंतन शिबिरात काँग्रेस जरुर संदेश देईल, अशी अपेक्षा होती. उदयपूरमध्ये या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. काँग्रेसने संघटना, कृषी, अर्थव्यवस्था, सामाजिक न्याय, आदी मुद्द्यांवर समित्या स्थापन करून या मुद्द्यांवर चर्चा करून ठराव संमत केले; परंतु, काँग्रेसला मते कशी मिळतील आणि काँग्रेस निवडणूक कशी जिंकेल, यासाठी एकही समिती स्थापन करण्यात आली नाही.ऑगस्टमध्ये काँग्रेस पाच वर्षांसाठी नवीन अध्यक्ष निवडणार आहे. तथापि, उदयपूर चिंतन शिबिराबाबत असे म्हणता येईल की, ऑपरेशन यशस्वी झाले; परंतु, रुग्ण दगावला.

नवा अध्यक्ष कोण? 

- पक्षातील नेतृत्वाबाबत अजूनही स्पष्ट संदेश नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कोणाच्या नेतृत्वात पक्ष लढणार आहे याबाबतचा संदेश पक्ष देऊ शकलेला नाही.

- २०१९ च्या निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून सोनिया गांधी पक्षाध्यक्ष आहेत.

- यावर्षी गुजरात आणि हिमाचलमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यात यश मिळविण्याचे आव्हान पक्षापुढे आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीSonia Gandhiसोनिया गांधी