शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

मतदानासाठी आलेल्या महिलेला हार्ट अटॅक; रांगेतला डॉक्टर मदतीला धावला, CPR देऊन जीव वाचवला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 18:29 IST

लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान एका महिलेला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर एका डॉक्टराने तात्काळ तिचे प्राण वाचवले.

Loksabha Election : देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी नागरिक मतदानासाठी मोठ्या संख्येने सकाळपासूनच बाहेर पडले होते. यामध्ये जेष्ठ नागरिकांपासून पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांचा देखील समावेश होता. मात्र या सगळ्यात कर्नाटकमध्ये अशी एक घटना घडली ज्यामुळे डॉक्टर हे देवाचं रुप असतात याचा प्रत्यय आला.

क्षणाचाही विचार न करता केलेली कृती आणि वैद्यकीय कौशल्याच्या उल्लेखनीय वापर करत बंगळुरूच्या एका डॉक्टरने शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यात मतदानासाठी आलेल्या एका महिलेचे प्राण वाचवले आहेत. बंगळुरुच्या जेपी नगर येथील मतदान केंद्रावर रांगेत उभे असताना एका महिलेसोबत हा सगळा प्रकार घडला.

जेपी नगर मतदान केंद्रावर एक महिला रांगेत उभी असताना अचानक खाली कोसळली. या प्रकारामुळे आजूबाजूचे मतदार देखील घाबरले. घडलेल्या प्रकाराची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली. मात्र तोपर्यंत शेजारच्या रांगेत उभ्या असलेल्या एका डॉक्टरांनी धाव घेत महिलेला जीवनदान दिलं.

मतदानासाठी आलेल्या महिलेला अचानक हृदयविकाराचा झटका आला. पाणी पित असतानाच ही महिला खाली कोसळली होती. त्यावेळी मतदानासाठी नारायणा हेल्थ सेंटरमधील डॉ. गणेश श्रीनिवास प्रसाद हे देखील शेजारच्या रांगेत उभे होते. त्यांनी घडलेला प्रकार पाहताच ५० वर्षीय पीडित महिलेकडे धाव घेतली आणि  तातडीने तिला सीपीआर दिला. सुदैवाने काही मिनिटांत महिला शुद्धीत आली. 

या सगळ्या प्रकाराची माहिती डॉ. गणेश श्रीनिवास प्रसाद यांनीच ‘एक्स’वरून दिली आहे. " रांगेत उभं असताना त्या महिलेला हृदयविकाराचा झटका आला. मी त्या महिलेची नाडी तपासली ती खूप कमी होती. तिचे डोळे तपासले असता कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. महिलेच्या शरीरात कोणतीही प्रतिक्रिया दिसून आली नाही आणि तिचा श्वास गुदमरत होता. मी ताबडतोब सीपीआर दिला आणि त्यांची प्रकृती सुधारली. मग इलेक्शन ड्युटीवर असलेल्या लोकांनी धावत येऊन ज्यूस दिला. रुग्णवाहिका बोलावून महिलेला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. उपचार करायला थोडा जरी उशीर झाला तर तिच्या जीवाला धोका होता," असे गणेश प्रसाद यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, देशातल्या १३ राज्यात ८८ जागांसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं आहे. आकडेवारीनुसार त्रिपुरा आणि मणिपूरमध्ये सर्वाधिक मतदान झालं आहे. तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात सर्वाधिक कमी मतदान झालं आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Bengaluruबेंगळूरkarnataka lok sabha election 2024कर्नाटक लोकसभा निवडणूक निकालHeart Attackहृदयविकाराचा झटका