शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जनादेश INDIA आघाडीच्या बाजूने नाही; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 22:08 IST

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालात एनडीएला स्पष्ट बहुमत असलं तरी नीतीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना सोबत आणण्यासाठी इंडिया आघाडी प्रयत्नशील आहे. 

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर दिल्लीत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झालेत. त्यात विरोधी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक दिल्लीत पार पडली. याचवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी मोठं विधान केले आहे. देशातील जनादेश इंडिया आघाडीच्या बाजूने नाही. काँग्रेसनं कधीही एकटे सरकार बनवणार असं म्हटलं नव्हतं. घटक पक्षांना सोबत घेत पुढे जाऊ असं काँग्रेस सांगत होती असं अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे नेते सातत्याने लोकसभेच्या निकालात भाजपाचा पराभव झालाय असं चित्र तयार करत आहेत. परंतु भाजपाला २४० जागा मिळाल्या तर एनडीएला २९२ जागांवर विजय मिळाला आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीकडे एकूण मिळून २३४ जागा आहेत. इंडिया आघाडीत सहभागी सर्व पक्षांच्या जागा मिळून भाजपाच्या मागे आहेत. त्यानंतरही काँग्रेससह विरोधी पक्षातील नेते भाजपाचा पराभव झाला असल्याचं सांगत आहेत. त्यावर अभिषेक मनु सिंघवींना प्रश्न विचारण्यात आला होता. न्यूज १८ ने त्यांची मुलाखत घेतली. 

त्यावर अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीतील जनादेश हा इंडिया आघाडीच्या बाजूने नाही. काँग्रेसनं कधीही स्वबळावर सरकार बनवू असं म्हटलं नाही. सुरुवातीपासून सहकारी पक्षांना सोबत घेऊन सरकार बनवू असं काँग्रेसनं म्हटलं होतं असं त्यांनी सांगितले. 

कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?

लोकसभा निवडणुकीचे निकाल सर्वांसाठी आश्चर्यकारक आहेत. भाजपाला गेल्या २ टर्मला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. परंतु यंदा पक्षाला मोठा फटका बसला आहे. भाजपाला यंदा २४० जागांवर समाधान मानावं लागलं आहे. दुसरीकडे ते बहुमतापासून ३२ जागा दूर आहेत. एनडीएला एकूण मिळून २९२ जागा आल्यात. काँग्रेस सातत्याने तिसऱ्यांदा तिहेरी आकडा गाठू शकली नाही. काँग्रेसला देशात ९९ जागा मिळाल्या आहेत. इंडिया आघाडीला एकूण मिळून २३४ जागा मिळाल्या आहेत. 

टॅग्स :congressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपाlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल