शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सर्वसामान्यांवर 'टोल'धाड! देशातील महामार्गावरील टोलमध्ये ५ ते १० टक्क्यांच्या वाढीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 14:38 IST

देशात सध्या मोठ्या प्रमाणात एकापेक्षा एक जबरदस्त महामार्ग आणि द्रूतगती मार्ग बांधले जात आहेत.

नवी दिल्ली

देशात सध्या मोठ्या प्रमाणात एकापेक्षा एक जबरदस्त महामार्ग आणि द्रूतगती मार्ग बांधले जात आहेत. नुकतंच दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचा पहिला टप्पा खुला करण्यात आला. हे महामार्ग सुरू झाल्याने एका बाजूला रस्ते वाहतुकीत सुधारणा झाली असली तर दुसऱ्याबाजूला महामार्गावरील टोलच्या दरात आता वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत आता तुमची लाँग ड्राइव्ह महाग होणार आहे.

देशातील महामार्गावर जमा होणाऱ्या टोल टॅक्समध्ये ५ ते १० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव एनएचएआयने ठेवला आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले की, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) टोल दर वाढविण्याचा प्रस्ताव तयार केला आहे आणि तो रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे पाठवला आहे. आता यावर लवकरच निर्णय होऊ शकतो.

या वाहनांसाठी टोल वाढणारसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, NHAI ने कारसारख्या हलक्या वाहनांसाठी ५ टक्के आणि ट्रक आणि बस यांसारख्या अवजड वाहनांसाठी १० टक्के टोल दरात वाढ करण्याचा प्रस्ताव रस्ते वाहतूक मंत्रालयाला पाठवला आहे. मंत्रालयाने NHAI च्या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल दिल्यास, नवीन टोल दर १ एप्रिल २०२३ पासून लागू होतील. मात्र, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. हा अंतिम निर्णय घेतल्यानंतरच रस्ते वाहतूक मंत्रालय आदेश जारी करेल.

सरकारने बजेटमध्ये केली १० लाख कोटींची तरतूदकेंद्रातील मोदी सरकार देशातील पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी वेगाने काम करत आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात जिथे सरकारने भांडवली खर्चासाठी ७.५ लाख कोटी रुपयांचे बजेट ठेवले होते. त्याच वेळी पुढील आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी ते १० लाख कोटी रुपये करण्यात आलं आहे.

भांडवली खर्चाचा मोठा हिस्सा देशातील रस्त्यांच्या विकासावर खर्च केला जातो. अलीकडेच सरकारने दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचा पहिला टप्पा सुरू केला. हा एक्स्प्रेस वे जगातील सर्वात लांब एक्स्प्रेस वेपैकी एक आहे. यामुळे दिल्ली ते मुंबई दरम्यानचा प्रवास २४ तासांवरून १२ तासांवर येईल. याशिवाय सरकार देशात सातत्याने रस्त्यांचे जाळे वाढवत आहे. देशाची राजधानी दिल्लीपासून आजूबाजूच्या प्रमुख शहरांमध्ये ट्राफिकमुक्त वाहतूक व्यवस्था करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

टॅग्स :NHAIभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण