शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

नव्या आधुनिक यंत्रणेद्वारे औद्योगिक प्रदूषणावर नजर

By admin | Published: March 07, 2016 10:54 PM

औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांद्वारे होणाऱ्या हवा व पाणी प्रदूषणावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची संयत्रे स्थापित करण्याच्या उपाययोजनेला मोठे यश प्राप्त झाले आहे.

सुरेश भटेवरा, नवी दिल्लीऔद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांद्वारे होणाऱ्या हवा व पाणी प्रदूषणावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची संयत्रे स्थापित करण्याच्या उपाययोजनेला मोठे यश प्राप्त झाले आहे. हवा आणि पाण्यात नियंत्रित मानकांपेक्षा अधिक प्रदूषण निर्माण करणाऱ्या कारखान्यांमध्ये दर १५ मिनिटाला उल्लंघनाचे प्रमाण किती, याचा ग्राफसह अहवाल देणारी यंत्रणा या संयत्रांमुळे कार्यरत झाली आहे. प्रदूषणावर २४ तास देखरेख ठेवणारी ही आधुनिक संयत्रे कारखान्यांनीच बसवली असून, उद्योग क्षेत्रातल्या बहुतांश कारखान्यांनी स्वयंस्फूर्तीने केंद्र सरकारच्या योजनेला साथ दिली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.योजनेचे तपशील देताना जावडेकर म्हणाले, प्रदूषणात भर घालणाऱ्या कारखान्यांची तपासणी यापूर्वी सरकारच्या निरीक्षकांमार्फत होत असे. ती पद्धत शास्त्रशुद्ध नव्हती आणि हवा आणि पाण्याच्या प्रदूषणात कोणत्या कारखान्याने किती भर घातली, ते सिद्ध करणारा पुरावाही उपलब्ध होत नसे. प्रदूषणात मोठी भर घालणारे कारखाने पर्यावरण मंत्रालयाने शोधून काढले. त्यात सर्वाधिक प्रदूषण पसरवणाऱ्या ३१४५ उद्योगांपैकी, आजमितीला २८२४ उद्योग सुरू आहेत. आमच्या प्रयत्नांमुळे यातील २२३१ म्हणजे जवळपास ८0 टक्के उद्योगांवर ३१ मार्च २0१६ अखेर प्रदूषणावर नियंत्रण प्रस्थापित करणारी संयंत्रे कार्यरत होत आहेत.हवेतील पार्टिकल्स, सल्फर डाय आॅक्साईड, नायट्रोजन डाय आॅक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, अमोनिया, तसेच पाण्यात मिसळणारे बायो केमिकल आॅक्सिजन डिमांड (बीओडी) केमिकल आॅक्सिजन डिमांड (सीओडी) टोटल सस्पेंडेड सॉलिड (टीएसएस) अमोनिकल नायट्रोजन इत्यादी १७ प्रकारच्या प्रदूषणाचा शोध लावण्यात, त्यांचे प्रमाण दर्शवण्यात ही संयंत्रे सक्षम आहेत. आजमितीला ११0१ कारखान्यांनी बसवलेल्या संयंत्रांशी पर्यावरण मंत्रालयाचा संपर्क स्थापित झाला आहे. प्रत्येक कारखान्याने अशी संयंत्रे लवकरात लवकर बसवावीत असे केंद्राचे निर्देश आहेत. त्यातील ५४४ उद्योगांनी त्याचे पालन केले नसून, त्यापैकी १४४ उद्योगांवर सरकारने कारवाई केली आणि प्रदूषण पसरवणारे कारखाने बंद करण्याचे आदेश दिले. नवी संयंत्रे बसवल्याशिवाय आता हे कारखाने सुरू होऊ शकणार नाहीत. याखेरीज ४0३ कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्या, असून नियोजित वेळेत सरकारचे निर्देश न पाळल्यास ते कारखानेही बंद केले जातील. त्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे, असे जावडेकर म्हणाले.