शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

प्रेमप्रकरण ठरतेय खुनाचे तिसरे सर्वांत मोठे कारण! महाराष्ट्रातून महिलांची तस्करी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 06:51 IST

लैंगिक छळ किंवा वेश्याव्यवसायात ढकलण्यासाठी महाराष्ट्रातून ७८४ महिलांची तस्करी करण्यात आली

नवी दिल्ली : देशात महिलांवर होत असलेल्या हल्ल्यांमध्ये २०२२ मध्ये १२.३ टक्क्यांनी वाढ झाली असून, सर्वाधिक छळ हा कुटुंबातील व्यक्तींकडूनच होत आहे. भारतात प्रत्येक तासाला तीन खून होतात, यातील एक खून हा प्रेमप्रकरणातून होत असल्याचे केंद्र सरकारच्या एनसीआरबी अहवालातून समोर आले आहे. मानवी तस्करीचे प्रमाणही २०२२ मध्ये वाढल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

महाराष्ट्रातून महिलांची तस्करी वाढलीदेशभरात ६,०३६ मानवी तस्करीच्या घटना घडल्या असून, यात ३,५९४ महिलांचा समावेश आहे. तर २,४४२ पुरुषांचा समावेश आहे. मानवी तस्करी केलेल्यांमध्ये १८ वर्षांखालील मुलांचाही समावेश आहे. महाराष्ट्रातून १८ वर्षांवरील देशातून सर्वाधिक ७४४ महिलांची तस्करी करण्यात आली आहे. तर बिहारमधून १८ वर्षांखालील मुलांची बालकामगार म्हणून वापर करण्यासाठी सर्वाधिक तस्करी करण्यात आली आहे

वेश्याव्यवसायासाठी तस्करी कुठून? लैंगिक छळ किंवा वेश्याव्यवसायात ढकलण्यासाठी महाराष्ट्रातून ७८४ महिलांची तस्करी करण्यात आली. यानंतर तेलंगणातून ६४६ महिलांची, बिहारमधून १२६ तर आंध्र प्रदेशमधून २६० महिलांची तस्करी करण्यात आली.  चाइल्ड पोर्नोग्राफीसाठी कर्नाटकातून ४७ जणांची तस्करी करण्यात आली.

राज्यातील पाच हजार मुले गायबदेशभरात १८ वर्षांखालील एक लाख २७ हजार ८७४ मुले गायब असून, महाराष्ट्रात एकूण पाच हजार ३९३ मुले गायब आहेत. त्यातील २,८०६ मुली आहेत. २०२२ मध्ये महाराष्ट्रातील तीन हजार ६९ मुले गायब आहेत. पश्चिम बंगालमधून सर्वाधिक १९ हजार ५४० मुले बेपत्ता आहेत.

एनसीआरबी अहवालात माहिती

  • ५८.५% बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध घेण्यात महाराष्ट्र पोलिसांना यश आले.
  • ५१.१% बेपत्ता झालेल्या नागरिकांना शोधण्यात देशभरात यश आले. बेपत्ता झालेल्या ४९% नागरिकांचा शोध घेण्यात पोलिसांना अपशय आले आहे. 
  • ८७.१% बेपत्ता नागरिकांना शोधण्यात केरळ पोलिसांना यश आले. त्यानंतर तेलंगणा (८६.४%), आसाम (७२.३%) या राज्यांचा क्रमांक लागतो.
  • १८.१% बेपत्ता नागरिकांना शोधण्यात ओडिशा पोलिसांना यश आले. हे देशातील सर्वाधिक कमी प्रमाण आहे.
  • ६१.८%  बेपत्ता महिलांचा शोध महाराष्ट्रात घेण्यात आला आहे.
टॅग्स :Missingबेपत्ता होणंCrime Newsगुन्हेगारी