शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी कायदा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 03:09 IST

भारतात पत्रकारांवर राजरोस हल्ले चढवले जात आहेत. गेल्या वर्षभरात १ हजारांहून अधिक पत्रकारांवर हल्ले झाले. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, छत्तिसगड, पश्चिम बंगाल, महाराष्ट्रासह अन्य राज्यात काही पत्रकारांना आपले प्राण गमवावे लागले.

सुरेश भटेवरानवी दिल्ली : भारतात पत्रकारांवर राजरोस हल्ले चढवले जात आहेत. गेल्या वर्षभरात १ हजारांहून अधिक पत्रकारांवर हल्ले झाले. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, छत्तिसगड, पश्चिम बंगाल, महाराष्ट्रासह अन्य राज्यात काही पत्रकारांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनांमुळे मीडियामध्ये असुरक्षिततेची भावना आहे.लोकशाहीचे पहारेकरीच सुरक्षित नाहीत तिथे मजबूत लोकशाहीची कल्पना कशी करणार? पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी देशात कायदा नाही. सरकारने हे विधेयक लवकर सादर करावे, अशी मागणी, काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी लोकसभेत विशेष उल्लेखाद्वारे केली.कौशल्य अभ्यासक्रम नि:शुल्क मौलाना आझाद शिक्षण प्रतिष्ठानद्वारा देशात अल्पसंख्यांक समुदायासाठी रोजगार उपलब्ध करून देणाºया अभ्यासक्रमांसाठी गरीब नवाज कौशल्य विकास प्रशिक्षण नामक योजना आहे. जीएसटीसंदर्भात प्रशिक्षण व जागरूकता निर्माण करण्यास काही अभ्यासक्रमांचा समावेश त्यात आहे. या केंद्राचे नुकतेच हैद्राबादला उद्घाटन झाले. अशी केंद्रे लवकरच देशभर स्थापन केली जाणार आहेत. हा अभ्यासक्रम विनामूल्य असेल, असे उत्तर अल्पसंख्यांक कार्य मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी खासदार राजीव सातव यांनी या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला दिले.किती काळ भारत मूकदर्शक भारताचे तिबेटियन नागरिकांशी ऐतिहासिक, सांस्कृतिक तथा पुरातन संबंध आहेत. मात्र तिबेटमधे सध्या जे घडते आहे, ते केवळ हिमनगाचे टोक आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकार कितीकाळ मूकदर्शकाची भूमिका बाजावणार? असा प्रश्न डॉ. नरेंद्र जाधव यांनी उपस्थित केला. त्याला उत्तर देताना परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज म्हणाल्या की, भारत कधीही मूकदर्शकाच्या भूमिकेत नव्हता. आजही नाही. भारताच्या हिताविरूध्द कोणताही विषय असेल तर सरकार प्रत्येक वेळी ठोस प्रतिक्रिया नोंदवते.ज्या राज्यात खासगी क्षेत्रातील लोक सरकारची ‘२0२२ पर्यंत सर्वांसाठी घरे’ ही योजना राबवण्यास उत्सुक आहेत, तिथे राज्य सरकार, महानगरपालिका अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने योजनांचे आराखडे व मंजुºयांना २ वर्षांपेक्षा अधिक काळ लागतो. हा विलंब टाळण्यास सरकार काय करू शकते? असा प्रश्न खा. अजय संचेती यांनी उपस्थित केला. त्यावर सभापती हमीद अन्सारींनी या विषयावर अल्पकालिन चर्चा उपस्थित करणारी नोटीस देण्याबाबत सुचवले.