शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

हे बघा आकडे; पोस्टल बॅलेटवरील मते दाखवत दिग्विजय सिंहांचा EVM बाबत गंभीर आरोप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 09:59 IST

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पक्षाला पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून मिळालेल्या मतांची आकडेवारी सांगत ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली आहे.

भोपाळ : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यातील राजस्थान आणि छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये काँग्रेसकडून सत्ता खेचून आणण्यात तर मध्य प्रदेशात आपली सत्ता कायम राखण्यात भाजपला यश मिळालं. तर तेलंगणात केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीचा धुव्वा उडवत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवलं. मिझोराममध्ये नवख्या ZPM पक्षाने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. या निवडणूक निकालांत काँग्रेसला मोठा धक्का बसला असून हिंदी पट्ट्यातील महत्त्वाची तीन राज्यं गमावल्यानंतर नेमकी चूक कुठे झाली, याबाबत पक्षात चिंतन सुरू आहे. अशातच मध्य प्रदेशमधील काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांनी मात्र इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन अर्थात ईव्हीएमबाबत गंभीर आरोप केले आहेत. चिप असणारी कोणतीही मशिन हॅक होऊ शकते, असा दावा दिग्विजय सिंहांनी केला आहे.

मध्य प्रदेशात भाजपला चितपट करत आपण पुन्हा सत्तेत येऊ, असा विश्वास काँग्रेस नेत्यांना होता. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीत काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. मध्य प्रदेश विधानसभेच्या २३० जागांपैकी भाजपने तब्बल १६३ जागा जिंकल्या, तर काँग्रेसला केवळ ६६ जागांवर यश मिळालं. मात्र एकीकडे काँग्रेसचा असा पराभव झालेला असताना दिग्विजय सिंह यांनी पक्षाला बॅलेट पेपरच्या माध्यमातून मिळालेल्या मतांची आकडेवारी सांगत ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली आहे.

"चिप असणारं कोणतंही मशिन हॅक होऊ शकतं. मी २००३ पासून ईव्हीएमला विरोध करत आहे. आपण आपल्या भारतीय लोकशाहीचं नियंत्रण प्रोफेशनल हॅकर्सच्या हातात देणार आहोत का? हा मुलभूत प्रश्न सर्व राजकीय पक्षांनी लक्षात घेतला पाहिजे. निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट यांनी कृपया भारतीय लोकशाहीचं रक्षण करावं," असं दिग्विजय सिंह यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

'पोस्टल बॅलेट आणि ईव्हीएमच्या आकड्यांमध्ये एवढा फरक कसा?'

दिग्विजय सिंह यांनी दुसऱ्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "पोस्टल बॅलेटवरून मिळालेल्या मतांनुसार काँग्रेसला १९९ मतदारसंघांमध्ये आघाडी आहे. मात्र यातील बहुतांश जागांवर ईव्हीएम मशिनवरून मिळालेल्या मतांमध्ये काँग्रेस मागे आहे. या दोन्ही माध्यमातून मिळालेल्या मतांवेळी वोटिंग पॅटर्नमध्ये इतका बदल कसा झाला आहे?" असा सवाल सिंह यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३Digvijaya Singhदिग्विजय सिंहcongressकाँग्रेसEVM Machineएव्हीएम मशीन