शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

"तोंड बंद करून गाडीत बसवलं, मारहाण केली आणि अखेर…’’, अपहृत मुलाने सांगितला भयावह अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 12:22 IST

Madhya Pradesh Crime News: मध्य प्रदेशमध्ये अपहरण झालेला शिवाया गुप्ता नावाचा मुलगा सुखरूप सापडला आहे. आता अपहरणकर्त्यांनी त्याच्यासोबत केलेल्या क्रौर्याचा भयावह अनुभव त्याने कथन केला आहे.

मध्य प्रदेशमध्येअपहरण झालेला शिवाया गुप्ता नावाचा मुलगा सुखरूप सापडला आहे. आता अपहरणकर्त्यांनी त्याच्यासोबत केलेल्या क्रौर्याचा भयावह अनुभव त्याने कथन केला आहे. ‘’ते काका माझं तोंड बंद करून मला घेऊन गेले. त्यांनी मला खूप मारलं. त्यांनी रुमाल बांधून माझे डोळे बंद केले होते. मला गाडीत बसवून खूप फिरवल्यावर ते मला अंधारात एका ठिकाणी सोडून गेले’’, अशी माहिती शिवाय याने दिली आहे. दरम्यान, शिवायचे वडील राहुल गुप्ता यांनी सांगितले की, माझ्या मुलाचं अपहरण झाल्यानंतर कुणीला आमच्याशी संपर्क साधला नाही. आमचं कुणाशीही शत्रुत्व नाही. तसेच हे अपहरण कुणी केलं, हेही आम्हाला माहिती नाही.

मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर शहरातील साखर व्यापारी असलेल्या राहुल गुप्ता यांचा ६ वर्षांचा मुलगा शिवाय गुप्ता याचं दोन दुचाकीस्वारांनी गुरुवारी सकाळी अपहरण केलं होतं. शहरातील सीपी कॉलनी येथून दिवसाढवळ्या अपहरण केल्यानंतर आरोपींनी या मुलाला मुरैना जिल्ह्यात अनेख ठिकाणी फिरवलं, मात्र तरीही पोलिसांना आरोपींचा काही सुगावा लागला नाही.

चंबळ जिल्ह्यात पोलिसांनी नाकेबंदी केल्याचा दावा केला होता. तरीही अपहरणकर्ते सुमारे ८० किमीपर्यंत दुचाकीवरून फिरत राहिले. त्यांनी मुलाचं तोंड आणि डोळे बंद करून ठेवले होते. मुलाच्या चेहऱ्यावर जखमांच्या खुणा दिसत आहेत, त्यामुळे त्याला मारहाण झाली असल्याची शक्यता  आहे. अखेरीस या अपहरणकर्त्यांनी या मुलाला मुरैना जिल्ह्यातील काजी बसई गावाबाहेर अंधारात सोडून पलायन केले. आता आपल्याकडून सुरू असलेल्या तपासामुळे घाबरून अपहरणकर्त्यांनी या मुलाला सोडल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे.

दरम्यान, काजी बसई गावच्या सरपंचांनी सांगितले की, येथील शेतकरी शेतीला पाणी दिल्यानंतर शेकोटी पेटवून बसले होते. यादरम्यान, अंधारात भयाण शांतता असताना एका मुलाच्या रडण्याचा आवाज त्यांना आला. ते जवळ गेले असता त्यांना शिवाय गुप्ता दिसला. सोशल मीडियावर शिवायच्या शोधमोहिमेसाठी अभियान सुरू असल्याने त्याला ओखळखणं फारसं कठीण गेलं नाही. त्यांनतर या मुलाला सरपंचांच्या घरी आणण्यात आलं. त्यानंतर सरपंचांनी याची माहिती पोलिसांना दिली.

अपहृत मुलगा सापडल्याची माहिती मिळताचा पोलीस महासंचालक अरविंद सक्सेना, डीआयजी अमित सांघी आणि ग्वाल्हेरचे पोलीस अधीक्षक धर्मवीर सिंह तातडीने मुरैना येथे पोहोचले. तिथे मुलाला ताब्यात घेऊन त्यांनी मुलाला घरी आणून त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवले.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण