शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

"हा देश केवळ 90 लोक चालवतात, कायदे करताना..."; राहुल गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 2:40 PM

राहुल गांधी म्हणाले, पैसा कुठे जाणार आणि कुणाला किती पैसा द्यायचा हे, हे 90 लोकच ठरवतात.

शाजापूर - हा देश केवळ 90 सचिव चालवतात. कायदे करताना किती लोकांचे मत जाणून घेतले जाते, हे आपण कुठल्याही खासदाराला अथवा आमदाराला विचारा. कायदे आरएसएसचे लोक आणि अधिकारी बनवतात. भाजपचे खासदार कायदे बनवत नाहीत. कायदा करताना एकाही खासदाराला विचारले जात नाही, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ते मध्यप्रदेशातील शाजापूर येथे जन आक्रोश रॅलीत बोलत होते.

राहुल गांधी म्हणाले, पैसा कुठे जाणार आणि कुणाला किती पैसा द्यायचा हे, हे 90 लोकच ठरवतात. 90 अधिकाऱ्यांपैकी केवळ 3 अधिकारी ओबीसी आहेत. मोदीजी म्हणतात, ओबीसींची भागिदारी आहे. पण या देशात ओबीसींची लोकसंख्या किती? हे कुणाला माहिती आहे का? ओबीसींची लोकसंख्या 50 टक्के आहे, पण ओबीसी अधिकारी केवळ तीन आहेत.

आदिवासी आणि दलितांसाठी मोदी काम करत नाहीत - राहुल गांधी म्हणाले, तीन वर्षांपूर्वी मोदी सरकारमध्ये केवळ शून्य अधिकारी होते. मोदीजी दलित, आदिवासी आणि ओबीसींसाठी काम करत नाहीत. मोदीजी केवळ सर्वसामान्यांचे लक्ष भरकटवतात. एवढेच नाही, तर भाजपवर हल्ला चढवत, हा विचारधारेचा लढा आहे. एका बाजूला काँग्रेसची विचारधारा आहे तर दुसऱ्या बाजूला भाजप आणि आरएसएसची विचारधारा आहे, असेही राहुल म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस