शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

Video: संतापजनक!; इंदूरमध्ये बेघर वृद्धांसोबत जणावरांसारखी वागणूक; ट्रकमध्ये ठासून शहराबाहेर सोडलं

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: January 30, 2021 12:50 IST

यासंदर्भात शुक्रवारी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात इंदौर नगरपालिकेची एक गाडी बेघर वृद्धांना शहराबाहेर देवास हायवेवर त्यांच्या साहित्यासह सोडण्यासाठी आली होती. मात्र, लोकांनी विरोध केल्यानंतर हीच गाडी या वृद्धांना परत गाडीत भरून घेऊन गेली.

इंदूर - देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळख असलेल्या इंदूरमध्ये एक अशी घटना समोर आली आहे, जीने मानवतेलाच मोठा हादरा दिला आहे. मध्य प्रदेशातील या शहरात बेघर वृद्धांना जनावरांप्रमाणे ट्रकमध्ये भरून शहराबाहेर सोडण्यात आल्याची हृदयाला पार पिरवटून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेनंतर, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या आदेशावरून तीन जणांना निलंबित करण्यात आले आहे.

यासंदर्भात शुक्रवारी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात इंदौर नगरपालिकेची एक गाडी बेघर वृद्धांना शहराबाहेर देवास हायवेवर त्यांच्या साहित्यासह सोडण्यासाठी आली होती. मात्र, लोकांनी विरोध केल्यानंतर हीच गाडी या वृद्धांना परत गाडीत भरून घेऊन गेली. यासंदर्भात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनीही व्हिडिओ ट्विट करत हा मानतेला कलंक असल्याचे म्हटले होते. तसेच शिवराज सरकारवर निशाणाही साधला होता.

सांगण्यात येते, की नगरपालिकेचा एक ट्रक काही निराधार आणि बेघर वृद्धांना घेऊन शहराबाहेरील इंदौर-देवास हायवेवर पोहोचला. येथे नगरपालिकेचे कर्मचारी या वृद्धांना गाडीतून खाली उतरवू लागले. याच वेळी काही स्थानिकांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना, या वृद्धांना शहराबाहेर अशा प्रकारे हायवेवर का सोडत आहात, अशी विचारणा केली. तेव्हा त्या कर्मचाऱ्यांना काहीही उत्तर देता आले नाही. 

 

यासंपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. चौहान यांच्या आदेशानंतर उपायुक्त प्रताप सोलंकी यांच्यासह इतर दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट करत, म्हटले आहे, 'आज इंदौरमध्ये नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून वृद्धांसोबत झालेल्या अमानवीय कृत्याची माहिती मिळाली. या प्रकरणात जबाबदार असलेल्या नगरपालिका उपायुक्तांसह दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच इंदौर जिल्हाधिकार्यांना या वृद्धांची देखभाल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वृद्धांसोबत अमानवीय व्यवहार कुठल्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. माझ्यासाठी नरसेवा हीच नारायण सेवा आहे. प्रत्येक वृद्धस आदर, प्रेम आणि सन्मान मिळायला हवा. हीच आपली संस्कृती आहे आणि मानव धर्मदेखील.'

यासंदर्भात नगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे, की थंडीमुळे या भिक्षूंना योग्य प्रकारे सुरक्षित स्थळी शेल्टरमध्ये हलविण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, यात हलगर्जीपणा झाला आहे. भविष्यात असे होऊ नये, यासाठी ठोस कारवाई केली जात आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा