शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

मणिपूरमध्ये भाजपानं गाठली मॅजिक फिगर

By admin | Published: March 13, 2017 11:38 AM

21 जागा मिळवणा-या भाजपानं मणिपूरमध्ये 11 आमदारांची जुळवाजुळव करत सरकार स्थापनेचा दावा केला आहे. प्रादेशिक पक्षांसह एका अपक्षाच्या पाठिंब्याचं पत्रच भाजपानं राज्यपालांना सुपूर्द केलं

ऑनलाइन लोकमतमणिपूर, दि. 13 - मणिपूर विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला जनतेनं स्पष्ट कौल दिला नसल्यानं सत्ता संघर्षाचा तिढा वाढला आहे. मणिपूरमध्ये 28 जागा जिंकून काँग्रेस मोठा पक्ष म्हणून समोर आला असला तरी भाजपा सत्ता स्थापण्याची शक्यता आहे. 21 जागा मिळवणा-या भाजपानं मणिपूरमध्ये 11 आमदारांची जुळवाजुळव करत सरकार स्थापनेचा दावा केला आहे. प्रादेशिक पक्षांसह एका अपक्षाच्या पाठिंब्याचं पत्रच भाजपानं राज्यपालांना सुपूर्द केलं आहे. 2012ला झालेल्या मणिपूरच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला एकही जागा मिळवता आली नव्हती. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं 21 आमदार निवडून आणले आहेत. चार जागा जिंकणा-या नागा पीपल्स फ्रंट आणि नॅशनल पीपल्स पार्टीनं भाजपाला पाठिंबा दिला आहे. त्याचसोबत लोकजनशक्ती पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि एक अपक्षही भाजपा सरकारमध्ये सामील होण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे मणिपूर विधानसभेतील भाजपाचं संख्याबळ 32च्या वर गेलं असून, भाजपानं लागलीच राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांच्याकडे 32 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र देऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे. (मणिपूरमध्ये भाजपची पहिल्या सरकारसाठी मोर्चेबांधणी)21 जागा पटकावणाऱ्या भाजपानंतर नॅशनलिस्ट पीपल्स पार्टी (एनपीपी), नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) ईशान्य लोकशाही आघाडीने प्रत्येकी चार काबीज केल्या. रालोआचा घटक पक्ष असलेला एलजीपी, तृणमूल काँग्रेस आणि अपक्षांनी प्रत्येकी एक जागा जिंकली आहे. एनपीपी-4, लोजपा-1 हे स्वतंत्ररीत्या लढले असले तरी रालोआत घटक पक्ष आहेत. आम्ही तृणमूल काँग्रेस आणि अपक्ष आमदारासोबत चर्चा करू, असे भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार एन. बीरेन यांनी सांगितले आहे.