शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

महाकुंभ चेंगराचेंगरीत 15000 लोकांचे नातेवाईक बेपत्ता; सपा खासदाराचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 17:32 IST

Mahakumbh Stampede: प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभात 29 जानेवारीच्या रात्री झालेल्या चेंगराचेंगरीनंतर विरोधक सातत्याने केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करत आहेत.

Mahakumbh Stampede: प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभात 29 जानेवारीच्या रात्री झालेल्या चेंगराचेंगरीनंतर विरोधक सातत्याने केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करत आहेत. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित केला जातोय. दरम्यान, समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार राम गोपाल यादव यांनीदेखील महाकुंभातील चेंगराचेंगरीचा मुद्दा उपस्थित करत मोठा दावा केला. 

महाकुंभ चेंगराचेंगरीवर संसदेत झालेल्या निदर्शनेनंतर समाजवादी पक्षाचे खासदार राम गोपाल यादव यांनी मंगळवारी दावा केला की, या घटनेनंतर 15,000 लोकांनी त्यांचे कुटुंबीय बेपत्ता असल्याची तक्रार केली आहे. या बेपत्ता व्यक्तींबाबत कोणतेही अपडेट किंवा माहिती सरकार देत नसल्याबद्दल यादव यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

15,000 बेपत्ता वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सपा खासदार राम गोपाल यादव यांनी मंगळवारी सांगितले की, चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर 15,000 लोकांनी आपले नातेवाईक बेपत्ता असल्याच्या तक्रारी दिल्या. पण, सरकार याबाबत कोणतीही माहिती द्यायला तयार ​​नाही. 1954 मध्ये प्रयाग कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी संसदेत बोलताना या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या लोकांची संख्या सांगितली होती.

याउलट उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे प्रशासन व्हीआयपींसाठी व्यवस्था करण्यात व्यस्त आहे. त्यांना सर्वसामान्यांची चिंता अजिबात चिंता नाही. मुख्यमंत्री रोज कुंभमेळ्यात हजर असतात. सर्व अधिकारी व्हीआयपी लेनची देखभाल करण्यात व्यस्त असतात. सर्वसामान्य लोक मरतात, याची त्यांना फिकीर नाही, अशी टीकाही सपा खासदार राम गोपाल यादव यांनी केली. 

विरोधकांची कारवाईची मागणी सोमवारी विरोधकांनी संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज उधळून लावले. 29 जानेवारी रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला, त्यावर तातडीने चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली. समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सोमवारी यूपी सरकारवर टीका केली आणि मौनी अमावस्येदरम्यान झालेल्या महाकुंभ चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांची यादी जाहीर न केल्याबद्दल सरकारला फटकारले. बिजू जनता दलाच्या (बीजेडी) सदस्या सुलता देव यांनीदेखील मृत आणि बेपत्ता भाविकांचा डेटा शोधण्यात सरकारच्या असमर्थतेवर प्रश्न केला. तसेच, या घटनेवर सभागृहात अल्पकालीन चर्चेची मागणी केली. 

टॅग्स :Samajwadi Partyसमाजवादी पार्टीKumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा