शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

निराधार, गरिबांना घरे देण्यात महाराष्ट्र पुढे

By admin | Published: March 02, 2017 5:50 AM

निराधार आणि गरिबांना निवारा उपलब्ध करून देण्यात महाराष्ट्र राज्य देशात चार राज्यांत पहिल्या स्थानावर आहे.

हरिश गुप्ता,नवी दिल्ली- निराधार आणि गरिबांना निवारा उपलब्ध करून देण्यात महाराष्ट्र राज्य देशात चार राज्यांत पहिल्या स्थानावर आहे. पश्चिम बंगालने जास्तीतजास्त गरिबांना घरांचा प्रत्यक्ष ताबा देण्यात आघाडी घेतली असून, महाराष्ट्र, गुजरात आणि तमिळनाडूनेही यात चांगले काम केले आहे.प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात शहरी निराधारांसाठी किती निवारे उपलब्ध आहेत याची प्रत्यक्ष खातरजमा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. या समितीचे अध्यक्ष दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. कैलाश गंभीर असून, समिती आपला अहवाल पुढील महिन्यात सादर करील. हे निवारे नॅशनल अर्बन लाईव्हलीहुड मिशनअंतर्गत (एनयूएलएम) मार्गदर्शक निकषांनुसार असल्याची खातरजमा ही समिती करील. तसेच निवारा घरे बांधण्याचा वेग कमी का, याची कारणे विचारणार आहे. या योजनेसाठी मंजूर झालेल्या निधीचा वापर न होणे, तो दुसऱ्या कामाकडे वळवणे किंवा त्याचा चुकीचा वापर करणे याचाही जाब समिती विचारेल.पश्चिम बंगाल अव्वल स्थानी जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिनिव्हल मिशन आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (नागरी) महाराष्ट्राला जवळपास तीन लाख घरे मंजूर झाली आहेत. एक लाख ३७ हजार २७५ घरांचे बांधकाम आधीच झालेले असून, गरीब कुटुंबांना ९८ हजार ६२ घरांचा ताबा दिला गेला आहे. तथापि, पश्चिम बंगालने त्याला मंजूर झालेल्या कोट्यापैकी ५० टक्के घरे बांधून पूर्ण केली आहेत आणि त्या सर्वांचा लाभार्थी गरिबांना दिला गेला आहे. पश्चिम बंगाल चार राज्यांत पहिल्या क्रमांकावर आहे.>137275 घरांचे बांधकाम पूर्ण झालेले आहे.- 98062 कुटुंबांना घरांचा ताबा दिला- 62514 घरांचे बांधकाम अद्याप बाकी- 297851 घरे महाराष्ट्रासाठी मंजूर झालेली आहेत