शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

Maharashtra Government: भाजपने महाराष्ट्रात सत्ता मिळविण्यासाठी केलेली कृत्ये लज्जास्पद -सोनिया गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 04:57 IST

भाजपने महाराष्ट्रात सत्ता मिळविण्यासाठी केलेली कृत्ये लज्जास्पद आहेत.

नवी दिल्ली : भाजपने महाराष्ट्रात सत्ता मिळविण्यासाठी केलेली कृत्ये लज्जास्पद आहेत. या पक्षाने लोकशाहीचे धिंडवडे काढले असून, तीन पक्षांच्या आघाडीने सरकार स्थापन करू नये म्हणून अनेक अडथळेही आणले, अशी घणाघाती टीका काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी केली आहे.काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीमध्ये त्या म्हणाल्या की, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान व गृहमंत्री यांच्या इशाऱ्यावरच काम केले. भाजपच्या अहंकारामुळेच त्यांची शिवसेनेबरोबरची युती टिकू शकली नाही.तीन पक्षांच्या आघाडीच्या मार्गात आणलेल्या अडथळ्यांविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे पंतप्रधान मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा पुरते उघडे पडले आहेत. महाराष्ट्रात तीन पक्षांची आघाडी भाजपचे वाईट मनसुबे हाणून पाडेल, असा दावा करून सोनिया गांधी म्हणाल्या की, मोदी सरकारने सभ्यतेला सोडचिठ्ठी दिलेली आहे. देशासमोरील गंभीर समस्या कशा सोडवाव्यात याची या सरकारला जाण नाही. आर्थिक पेचप्रसंगाने गंभीर स्वरूप धारण केले असून, त्यामुळे देशाच्या विकासावरही परिणाम झाला आहे.बेकारी वाढत असून, गुंतवणुकीचा ओघ आटला आहे. शेतकरी, व्यापारी, लघु तसेच मध्यम उद्योजक चिंताक्रांत आहेत. देशाची निर्यात घटली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना रोजचे आयुष्य जगणे त्रासदायक झाले आहे. दुस-या बाजूला मोदी सरकार देशाच्या विकासाबाबत आकड्यांचा फसवा खेळ करण्यात गुंतले आहे. वास्तव दर्शविणारी आकडेवारी प्रसिद्ध करण्यास हे सरकार तयार नाही, असेही त्या म्हणाल्या.उद्योगपतींना उपकृत करण्याचा डावसोनिया गांधी यांनी सांगितले की, काही सार्वजनिक उपक्रम आपल्या मर्जीतील उद्योगपतींच्या घशात घालण्याचे मोदी सरकारचे प्रयत्न आहेत. त्याचसाठी या उपक्रमांमध्ये निर्गुंतवणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे. देशातील राज्यघटना, लोकशाही वाचविण्यासाठी, जनतेच्या भल्यासाठी काँग्रेस नेहमीच लढा देत राहील, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019