शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
इस्रायलच्या तेलानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
3
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
4
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
5
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
6
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
7
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
8
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
9
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
10
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
11
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
12
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
13
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
14
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
15
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
16
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
17
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
18
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
20
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल

महाराष्ट्र शेतकरी अनुकूल राज्य

By admin | Published: November 01, 2016 3:37 AM

कृषी क्षेत्रातील सुधारणांवरील नीती आयोगाच्या निर्देशांकानुसार गुजरात आणि राजस्थाननंतर देशात महाराष्ट्र शेतकरी अनुकूल राज्य म्हणून पुढे आले

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील सुधारणांवरील नीती आयोगाच्या निर्देशांकानुसार गुजरात आणि राजस्थाननंतर देशात महाराष्ट्र शेतकरी अनुकूल राज्य म्हणून पुढे आले आहे. कृषी क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी राज्याच्या ‘कृषी विपणन आणि शेतकरी अनुकूल सुधारणा निर्देशांक’च्या आधारावर नीती आयोगाने अहवाल तयार केला आहे. कृषी क्षेत्रात विविध सुधारणा लागू करण्यात राज्याने पहिला क्रमांक मिळविला आहे. राज्याने विपणन सुधारणा लागू करतानाच देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कृषी व्यवसायासाठी सर्वोत्तम वातावरण तयार केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कृषी सुधारणांमध्ये पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब, आसाम, झारखंड, तामिळनाडू आणि जम्मू व काश्मीर या राज्यांसह २९ राज्यांपैकी २० राज्यांनी खराब प्रदर्शन केले आहे. निर्देशांकामध्ये राज्याच्या आकडेवारीनुसार मध्य प्रदेश चौथ्या क्रमांकावर असून त्यापाठोपाठ हरियाणा, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, गोवा आणि छत्तीसगडचा क्रमांक लागतो. कमी उत्पादन, कमी कृषी उत्पादन आणि कृषी संकटाने ग्रस्त असलेल्या राज्यांची ओळख करून त्यांना मदत करण्याचा निर्देशांकाचा मुख्य उद्देश आहे. देशात कृषी विपणनात सुधारणा, जमीनपट्टा सुधारणा आणि खासगी जमिनीवर वन्य संबंधित सुधारणा करून कृषी उत्पन्न दुपट्ट करण्याच्या उद्देशाने नीती आयोगाने हे पाऊल उचलले आहे. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये अर्धवट, आंशिक, किरकोळ आणि फारच कमी कृषी सुधारणा झाल्याचे आयोगाच्या विस्तृत अहवालात नमूद केले आहे.