शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
2
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
3
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
4
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
5
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
6
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
7
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
8
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
9
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
10
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
11
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
12
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
13
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
14
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
15
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
16
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
17
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
18
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
19
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
20
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास

महाराष्ट्राच्या निकालाने देशातील राजकारण बदलेल, वातावरण काँग्रेसच्या बाजूने: सोनिया गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 5:36 AM

सोनिया गांधी म्हणाल्या की, देशातील वातावरण पक्षाच्या बाजूने आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही चांगली कामगिरी केली तर राष्ट्रीय राजकारणात मोठा बदल होईल.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली:  महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीर या चार राज्यांमध्ये काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. देशातील वातावरण पक्षाच्या बाजूने आहे. मात्र, अतिआत्मविश्वास न ठेवता आपल्याला एकजुटीने काम करावे लागेल. लोकसभा निवडणुकीत मिळालेला जनतेचा पाठिंबा आणि भावना आपल्याला कायम ठेवायच्या आहेत, असे काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी बुधवारी पक्षाच्या नेत्यांना सांगितले.

सोनिया गांधी म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीप्रमाणे चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही चांगली कामगिरी केली तर राष्ट्रीय राजकारणात मोठा बदल होईल. यावेळी त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तिखट हल्ला चढवला. लोकसभा निवडणुकीतील धक्क्यातून धडा घेण्याऐवजी मोदी सरकार अजूनही समुदायांमध्ये फूट पाडत असून, भीती आणि शत्रुत्व पसरवत आहे. जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत सोनिया गांधी बोलत होत्या. यावेळी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्यासह सर्व खासदार उपस्थित होते.

गांधी म्हणाल्या...

जनगणना करण्याचा सरकारचा कोणताही इरादा नाही.आमचे किमान १२ कोटी नागरिक  राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याच्या लाभांपासून वंचित आहेत.काही आठवड्यांत किमान ११ दहशतवादी हल्ले ही अत्यंत अस्वस्थ करणारी बातमी.जम्मू-काश्मीरमध्ये सर्व काही ठीक असल्याचा दावा हास्यास्पद.मणिपूरमधील परिस्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे नाहीत.

नियम का बदलले?

उत्तर प्रदेशातील कावड यात्रेच्या मार्गावर दुकानदारांची नावे लावण्याचा निर्णय का घेण्यात आला? सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाने योग्य वेळी हस्तक्षेप केला; परंतु तो केवळ तात्पुरता दिलासा असू शकतो. नोकरशाहीला आरएसएसच्या कार्यात सहभागी होण्यासाठी नियम अचानक बदलण्यात आले, असा दावा त्यांनी केला. 

 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे