शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

युद्धसज्जतेसाठी भारतीय लष्कराची मोठी पूर्वतयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2022 3:20 PM

अरुणाचल प्रदेशचा सीमावर्ती भाग अतिशय संवेदनशील आहे. तिथे रस्ते व पूलबांधणी, दारुगोळा कोठारे यांची बांधकामे वेगाने सुरू आहेत. भारतीय लष्कराला अधिकाधिक सुविधा मिळाव्यात, यासाठी केंद्र सरकारही प्रयत्नशील आहे. 

दिनजान : अरुणाचल प्रदेशालगत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराच्या तैनातीची फेरआखणी करण्यात येत आहे. लष्कराने नेहमी युद्धसज्ज असण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने दिली. पूर्व लडाखमध्ये चीनसोबत गेल्या दोन वर्षांपासून जो संघर्ष सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्करामध्ये या हालचाली सुरू आहेत. 

अरुणाचल प्रदेशचा सीमावर्ती भाग अतिशय संवेदनशील आहे. तिथे रस्ते व पूलबांधणी, दारुगोळा कोठारे यांची बांधकामे वेगाने सुरू आहेत. भारतीय लष्कराला अधिकाधिक सुविधा मिळाव्यात, यासाठी केंद्र सरकारही प्रयत्नशील आहे. 

२ माउंटन डिव्हिजनचे जनरल कमांडिंग ऑफिसर (जीओसी) मेजर जनरल एम. एस. बैन्स यांनी सांगितले की, अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या चीनच्या सीमाभागात भारतीय लष्कर अधिक सतर्क झाले आहे. ही सीमा ओलांडून होणारे घुसखोरीचे प्रकार रोखण्यासाठी पूर्वी लष्कराचे जवान तैनात असत. आता ही जबाबदारी आसाम रायफल्सकडे सोपविण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेशच्या दिबांग खोऱ्यात रस्ते, पूल, बोगदे, हेलिपॅड व इतर सुविधांचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आले आहे. 

अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमाभागात चीनने आपल्या हद्दीत जागोजागी मोबाइल टॉवर बसविले आहेत. त्यामुळे भारताने अरुणाचल प्रदेशातील किबितू, हायुलिआंग भागात ४ जी टॉवरचे जाळे विस्तारण्यावर भर दिला आहे. २०२१ ते २०२५ या कालावधीत अरुणाचल प्रदेशाला लागून असलेल्या सीमाभागात अनेक सुविधांची उभारणी करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारतSoldierसैनिक