शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

रेल्वे प्रवासाचे आरक्षण आता १२० नव्हे, ६० दिवस आधी करा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 06:55 IST

आधी ही मर्यादा १२० दिवसांची होती. नवीन व्यवस्था १ नोव्हेंबर २०२४ पासून लागू होईल.

नवी दिल्ली : रेल्वे बोर्डाने आसनांचा ‘आगाऊ आरक्षण कालावधी’ (एआरपी) १२० दिवसांवरून घटवून ६० दिवस केला आहे. म्हणजेच आता प्रवासाच्या केवळ ६० दिवस आधी रेल्वे आसनाचे आरक्षण करता येऊ शकेल. आधी ही मर्यादा १२० दिवसांची होती. नवीन व्यवस्था १ नोव्हेंबर २०२४ पासून लागू होईल.

रेल्वे बोर्डाने १६ ऑक्टोबर रोजी यासंबंधीचे परिपत्रक जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, १ नोव्हेंबर २०२४ पासून आगाऊ आरक्षणाची कालमर्यादा १२० दिवसांवरून घटवून ६० दिवस (प्रवासाची तारीख सोडून) करण्यात आली आहे. या निर्णयामागील कोणतेही कारण या परिपत्रकात देण्यात आलेले नाही. 

ताज एक्स्प्रेस, गोमती एक्स्प्रेस यांसारख्या दिवसा चालणाऱ्या काही रेल्वेच्या कालमर्यादेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कारण त्यांची कालमर्यादा आधीच कमी आहे. विदेशी पर्यटकांसाठी असलेल्या ३६५ दिवसांच्या कालमर्यादेतही कोणताच बदल करण्यात आलेला नाही. 

आधी किती होता कालावधी?- आधी एआरपी कालावधी ६० दिवसांचाच होता. २०१५मध्ये तो वाढवून १२० दिवसांचा केला होता.- ३१ ऑक्टोबरपर्यंत करण्यात आलेली १२० दिवसांची आगाऊ आरक्षणे वैध असतील. तसेच ६० दिवसांपेक्षा जास्त कालावधीचे बुकिंग रद्द करण्याचीही अनुमती असेल. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेpassengerप्रवासी