शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

रेल्वेच्या अवस्थेवरुन खरगेंचा सरकारवर हल्लाबोल; 'वंदे भारत' ट्रेनबाबत केला मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 21:51 IST

'काँग्रेसचे सरकार आल्यावर भारताचे विकास इंजिन म्हणून रेल्वेचे पुनरुज्जीवन करणार.'

नवी दिल्ली- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी रेल्वेच्या दुरवस्थेवरुन भाजप सरकारवर जोरदार टीका केली. सरकारने रेल्वेची आर्थिक हानी केली, रेल्वेची सुरक्षा, सामर्थ्य आणि कार्यक्षमता नष्ट करुन रेल्वेची नासधूस केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, काँग्रेसचे सरकार आल्यावर भारताचे विकास इंजिन म्हणून रेल्वेचे पुनरुज्जीवन करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

मल्लिकार्जुन खर्गे पुढे म्हणतात, नरेंद्र मोदींच्या राजवटीत रेल्वे उद्ध्वस्त झाली. सरकारने रेल्वे गाड्यांना स्वतःच्या प्रचाराचे साधन बनवले. रेल्वे आजही करोडो भारतीयांची जीवनवाहिनी आहे, पण मोदींच्या राजवटीत तिची अवस्था बिकट होत आहे. CAG-2023 चा हवाला देऊन ते म्हणाले की, वेळेवर धावणाऱ्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांची संख्या 2012-13 मधील 79 टक्क्यांवरून 2018-19 मध्ये 69.23 टक्क्यांवर आली. 58,459 कोटी रुपयांपैकी केवळ 0.7 टक्के निधी ट्रॅकच्या नूतनीकरणासाठी खर्च केला जातो. यामुळेच वंदे भारत हायस्पीड ट्रेनचा सरासरी वेग ताशी 180 किमी ऐवजी केवळ 83 किमी प्रतितास आहे.

2031 पर्यंत 750 रेल्वे स्थानकांपैकी 30 टक्के आणि सर्व मालगाड्यांचे खाजगीकरण केले जाणार. सर्व नफा कमावणाऱ्या एसी कोचचेही खाजगीकरण केले जाईल. रेल्वेकडे फक्त तोट्यात असलेल्या द्वितीय श्रेणीच्या प्रवासी गाड्या उरल्या आहेत, असा दावाही खर्गेंनी यावेळी केला. यावेळी त्यांनी भाजप सरकारला सात प्रश्नही विचारले.

  1. भाजप सरकारने रेल्वेतील 3 लाखांहून अधिक रिक्त जागा का भरल्या नाहीत? 
  2. प्रति किलोमीटर प्रति प्रवासी सरासरी भाडे 2013-14 (UPA) मधील 0.32 वरुन 2023 मध्ये 0.66 पैसे का झाले?
  3. 2017 ते 2021 दरम्यान ट्रेनशी संबंधित 100,000 पेक्षा जास्त मृत्यू नोंदवले गेले, हे खरे नाही का? 
  4. कोव्हिड महामारीच्या काळात मोदी सरकारने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसाठीच्या सवलती का रद्द केल्या?
  5. CAG नुसार, ₹58,459 कोटींपैकी फक्त 0.7% निधी ट्रॅक नूतनीकरणासाठी खर्च करण्यात आला. का?
  6. रेल्वे अर्थसंकल्प विलीन करुन मागच्या दाराने निधी कमी करण्याच्या हालचाली झाल्या, हे खरे नाही का?
  7. मोदी सरकारने भारतीय रेल्वेच्या खाजगीकरणाची एक भव्य योजना सुरू केली आणि वाढीव खाजगीकरण आधीच सुरू झाले, हे खरे नाही का? असे प्रश्न खर्गे यांनी मोदी सरकारला विचारले.
टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार