शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी पुन्हा रुग्णालयात, आठवडाभरात दुसऱ्यांदा झाले दाखल
2
"आदिवासी नेत्याला CM पदावरून हटवणे अत्यंत दु:खद", हिमंता बिस्वा सरमा यांचा जेएमएम-काँग्रेसवर निशाणा
3
"मी आधीच निघून गेलो होतो, समाजकंटकांनी..."! हाथरस दुर्घटनेवर भोले बाबा यांची पहिली प्रतिक्रिया
4
18 राज्‍यांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा जगात डंका, यांच्याकडून मिळतो तब्बल 90 टक्के पैसा!
5
राहुल द्रविडने नेमकं काय केलं? फक्त ‘त्या’ एका गोष्टीला ‘हरवलं’ अन् टीम इंडियानं जग जिंकलं.. 
6
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी ३१ ऑगस्टनंतरही सुरु राहणार”: आदिती तटकरे
7
जो बायडेन यांचा पत्ता कट? मिशेल ओबामा लढवणार राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक
8
झारखंडमध्ये नेतृत्वबदल, चंपई सोरेन यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, हेमंत सोरेन पुन्हा होणार CM  
9
"जगभर फिरतात, पण मणिपूरला जात नाहीत..." काँग्रेसची पीएम नरेंद्र मोदींवर बोचरी टीका
10
“ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेंच्या लोकांचा, काही पदरात पाडून घेण्याचा प्रोग्राम”: नवनाथ वाघामारे
11
कोल्हापूर : वर्दी परिधान करण्याअगोदरच मृत्यू; २६ वर्षीय तरूणाची चटका लावणारी एक्झिट
12
“लोणावळा भुशी धरण दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत”: अजित पवार
13
कुटुंबातील दोन जणींना लाभ,'लाडकी बहीण'चे निकष बदलले, फडणवीसांनी महिलांना असे आवाहन केले  
14
भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनला तर काय-काय बदलेल? खुद्द PM मोदींनी सांगिलं
15
Champions Trophy 2025 : लाहोरमध्ये होणार IND vs PAK महामुकाबला; सामन्याची तारीख ठरली?
16
लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला तरी लढाई अजून संपलेली नाही, नाना पटोले यांचे स्पष्ट संकेत 
17
संभाजी भिडेंचे ते वक्तव्य अन् हिरवाई उद्यान; पुण्यात लागले मस्त आणि त्रस्त ग्रुपचे बॅनर
18
खासदारकीची शपथ घेण्यासाठी तुरुगांतून बाहेर येणार अमृतपाल सिंह, पॅरोल मिळाल्याची माहिती 
19
४ जुलैला मरीन ड्राईव्ह, वानखेडेवर भेटू...; भारताच्या वाटेवर असताना रोहित शर्माची मोठी घोषणा
20
“हे खरे नसेल तर माझ्यावर हक्कभंग आणा”; पेपरफुटीवरुन देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना आव्हान

"आणीबाणीशिवाय PM मोदींकडे बोलायला काहीच नाही", मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 12:56 PM

सोमवारी एकूण २८० खासदार शपथ घेणार आहेत, तर मंगळवारी २६४ खासदार शपथ घेणार आहेत.

नवी दिल्ली : १८ व्या लोकसभेचे पहिले विशेष अधिवेशन आजपासून सुरू झाले असून खासदार शपथ घेत आहेत. पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, मनोहर लाल खट्टर आणि यांच्यासह इतर केंद्रीय मंत्र्यांनी शपथ घेतली. सोमवारी एकूण २८० खासदार शपथ घेणार आहेत, तर मंगळवारी २६४ खासदार शपथ घेणार आहेत. ही शपथ राज्यनिहाय खासदारांना दिली जात आहे. 

लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब हे खासदारांना शपथ देत आहेत. दरम्यान, विरोधकांकडून गदारोळ सुरू आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांनी संविधानाच्या प्रती हातात घेऊन निषेध केला.याचबरोबर, लोकसभेच्या हंगामी अध्यक्षांच्या निवडीवरून इंडिया आघाडीचे खासदार नाराज आहेत. याबाबत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, संसदेच्या इतिहासात हंगामी अध्यक्ष हा मुद्दा कधीच नव्हता. आम्ही संविधान आणि नियमानुसार काम करतो. सर्व सदस्यांनी मिळून संसद चालवायची आहे. 

२६ जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. दरम्यान, अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी सहकार्याचे आवाहन करताना विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही मोठं विधान केले आहे.

संसदेबाहेर इंडिया आघाडीचे आंदोलन सुरू आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, पंतप्रधान किती दिवस हे बोलत राहतील, कुणास ठाऊक. त्यांच्याकडे आणीबाणीशिवाय बोलायला काहीच नाही. जे होते, ते घोषित केले होते. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, ती अनसेड इमर्जन्सी (अघोषित आणीबाणी) आहे. आम्ही संविधान वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नात जनता आमच्यासोबत आहे, पण मोदीजींनी संविधान तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच आज येथे आंदोलन करत आहोत.प्रत्येक लोकशाही नियम मोडला जात आहे, म्हणूनच आज आम्ही मोदीजींना संविधानाचे पालन करण्यास सांगत आहोत. 

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?विरोधकांवर हल्लाबोल करताना पीएम मोदी म्हणाले की, "उद्या २५ जून आहे. ५० वर्षांपूर्वी याच दिवशी संविधानावर काळा डाग लागला होता. अशी काळ देशात कधीही येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करू. ज्यांची भारतातील लोकशाही परंपरांवर निष्ठा आहे. त्यांच्यासाठी २५ जून हा दिवस अविस्मरणीय आहे. राज्यघटना पूर्णपणे नाकारली गेली हे भारताची नवी पिढी कधीही विसरणार नाही. भारताचे तुरुंगात रूपांतर झाले. लोकशाही पूर्णपणे दाबली गेली. आणीबाणीची ही ५० वर्षे ही प्रतिज्ञा आहे की आपण आपल्या राज्यघटनेचे रक्षण करू आणि भारताच्या लोकशाही परंपरांचे रक्षण करू, तर देशवासीय संकल्प करतील की भारतात पुन्हा असे कृत्य करण्याची हिंमत कोणीही करणार नाही."

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभा