शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या सांगण्यावरून मला अध्यक्षपद मिळाले - मल्लिकार्जुन खर्गे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 14:46 IST

मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधत काँग्रेसने संविधान आणि लोकशाहीचे रक्षण केले नसते तर नरेंद्र मोदी कधीच पंतप्रधान झाले नसते, असे म्हटले आहे.

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वतः पक्षप्रमुख होण्याबाबत मोठा खुलासा केला आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून मला अध्यक्षपद मिळाले, असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले. याचबरोबर, मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधत काँग्रेसने संविधान आणि लोकशाहीचे रक्षण केले नसते तर नरेंद्र मोदी कधीच पंतप्रधान झाले नसते, असे म्हटले आहे. महिला काँग्रेसच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत फक्त स्वतःबद्दल बोलतात. त्यांना गांधी, नेहरू, पटेल, आंबेडकर आठवत नाहीत. मणिपूर जळत आहे, पण पंतप्रधान तिकडे गेले नाहीत, असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले. तसेच, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १५ ऑगस्टच्या भाषणावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर सांगितले की, पुढच्यावेळी ते पुन्हा येथे ध्वजारोहण करतील. मी म्हणालो, ते झेंडा नक्कीच फडकावतील पण आपल्या घरी आणि अमित शहा आपल्या घरी पत्नीसह आपल्या घरी फडकवतील. 

याचबरोबर मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, राहुल गांधी भारताला जोडण्याचे काम करतात तर पंतप्रधान ते तोडण्याचे काम करतात. पुरुषांपेक्षा महिला मतदार जास्त आहेत. महिलांनी निर्धार केला तर त्या भाजप सरकारला हटवू शकतात. तसेच, बांगलादेश युद्धाचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले की, इंदिरा गांधींनी बांगलादेश स्वतंत्र केला, पाकिस्तानच्या एक लाख लोकांना तुरुंगात टाकले. तर आकाशात उडणाऱ्या गरुडाला म्हैस म्हणत मोदींनी दिशाभूल केली. याशिवाय, विरोधी पक्षांच्या नेत्यांना तपास यंत्रणांकडून टार्गेट केले जात आहे. मात्र, काँग्रेस घाबरत नाही, असेही मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी