शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

भाजपविराेधात आघाडीचे ममतांचे पुन्हा प्रयत्न; विराेधी पक्षांच्या मुख्यमंत्री व नेत्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 05:07 IST

भाजपने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आराेप

काेलकाता : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विराेधी पक्षांना भाजपविराेधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हाेत असल्याचा आराेपही त्यांनी केला असून, भाजपविराेधात नवी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न ममतांनी सुरू केले आहेत. त्यांनी सर्व गैरभाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री विराेधी पक्षाच्या नेत्यांना पत्र लिहिले असून, भाजपविराेधात एकजुटीने लढा देण्याची गरज असल्याचे पत्रात म्हटले आहे. या लढ्याची रणनीती ठरविण्यासाठी ममतांनी बैठकही बाेलाविली आहे.ममता बॅनर्जींनी लिहिले आहे की, भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकार सुडाचे राजकारण करीत असून, सीबीआय, ईडी यासारख्या संस्थांचा गैरवापर करून देशातील लाेकशाहीवर हल्ला हाेत आहे. निवडणुका जवळ असतात, त्यावेळी केंद्रीय तपास यंत्रणा ॲक्शन माेडवर येतात. या दडपशाहीचा प्रतिकार करायला हवा. विराेधकांचा छळ करून काेंडीत पकडण्याचे राजकारण भाजपकडून सुरू आहे. त्यामुळे सर्व विराेधकांनी याविराेधात एकत्र येऊन या दडपशाहीचा प्रतिकार करायला हवा. प्रत्येकाला साेयीस्कर ठरेल अशा ठिकाणी सर्वांची बैठक घेऊन पुढील दिशा ठरविण्याबाबत चर्चा करू, असे आवाहन ममतांनी पत्राद्वारे भाजप विराेधकांना केले आहे.

मार्च महिन्यामध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतरही ममतांनी सर्व विराेधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले हाेते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसला बाजूला ठेवून आघाडी उभी करण्याचा प्रयत्न केला हाेता.तृणमूलमध्ये विश्वासार्हता नाही- काँग्रेसममतांच्या पत्रावर प्रतिक्रिया देताना पश्चिम बंगाल भाजपचे प्रवक्ते समिक भट्टाचार्य यांनी सांगितले, की तृणमूलची राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाकांक्षा आहे. मात्र, ती पूर्णपणे फसली आहे. तर तृणमूलमध्ये भाजपविराेधात लढण्यासाठी विश्वासार्हता नसल्याचे पक्षाचे ज्येष्ठ नेते अब्दुल मन्नन यांनी सांगितले.अभिषेक बॅनर्जी ईडीच्या चाैकशीला गैरहजरतृणमूल काँग्रेसचे खासदार आणि ममता बॅनर्जींचे पुतणे अभिषेक बॅनर्जी हे ईडीच्या चाैकशीला गैरहजर राहिले. मनी लाँड्रिंग आणि काेळसा घाेटाळ्याप्रकरणी त्यांना चाैकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले हाेते. मात्र, वैयक्तिक कारण देऊन त्यांनी हजर राहण्यास असमर्थ असल्याचे ईडीला कळविल्याचे सांगण्यात आले आहे. चाैकशीसाठी त्यांना पुन्हा समन्स बजाविण्यात येऊ शकताे. यापूर्वी २१ मार्च राेजी त्यांची सुमारे आठ तास चाैकशी करण्यात आली हाेती.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जी