शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पश्चिम बंगाल : 'मां किचन'मध्ये ५ रूपयांत पोटभर जेवण; भाजप म्हणतं,"हा तर राजकीय स्टंट"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 11:24 IST

West Bengal : ममता बॅनर्जींच्या 'मा किचनवरून' भाजपची ममता बॅनर्जींवर जोरदार टीका, त्या अपयशी ठरल्याचा केला दावा

ठळक मुद्देममता बॅनर्जींच्या 'मा किचनवरून' भाजपची ममता बॅनर्जींवर जोरदार टीकाममता बॅनर्जी अपयशी ठरल्याचा केला दावा

पुढील काही महिन्यांमध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसण्यास सुरूवात केली आहे. प्रत्येक पक्ष मतदारांना काही ना काही आश्वासनं देण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच पश्चिम बंगालमध्येममता बॅनर्जी सरकारनं 'मां किचन' ही योजना सुरू केली आहे. यापूर्वीही कर्नाटकात इंदिरा कॅन्टिन आणि तामिळनाडून अम्मा कॅन्टिन अशा योजना सुरू करण्यात आल्या होत्या. ममता बॅनर्जी यांनी सुरू केलेल्या योजनेमध्ये गरीबांना ५ रूपयांत पोटभर जेवण मिळणार आहे. थाळीत पाच रूपयांत भात, भाजी, डाळ आणि एक अंड देण्यात येईल. दरम्यान, भारतीय जनता पक्षानं हा निवडणुकीचा स्टंट असल्याचं म्हणत यावर टीका केली. परंतु यानंतर तृणमूल काँग्रेसनंही भाजपवर पलटवार करत निडणुकांच्या काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील राज्यात अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू केल्याचं म्हटलं. "हे मां किचन आहे. आपल्याला सर्वांना आपल्या आईचा अभिमान आहे. ज्या ठिकाणी आई असेल त्या ठिकाणी सर्वकाही चांगलंच असेल. आपण सर्वच आपल्या आईला सलाम करतो," असं या योजनेच्या उद्धाटनावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या. यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी राज्यातील गरीब जनतेसाठी दुआरे सरकार (सरकार तुमच्या दरवाज्यावर) आणि आरोग्य साथी (आरोग्य विमा) अशा योजना सुरू केल्या. दरम्यान, मां किचन या योजनेवरून भाजपनं ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. "बंगालमधील लोकांकडे आपली भूक भागवण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळेत त्यांना मां किचन सुरू करावं लागलं आहे जेणेकरून लोकांना पाच रूपयांत जेवणं मिळेल, त्या अयशस्वी ठरल्याचं त्यांनी सिद्ध केलं आहे. लोकं भिकारी बनले आणि आणि त्यांना पाच रुपयांत जेवण द्यावं लागतं आहे," असं म्हणत पश्चिम बंगालचे भाजप प्रमुख दिलीप घोष यांनी निशाणा साधला. निवडणुकांच्याच वेळी दौरे का?"पंतप्रधान केवळ निवडणुकांच्या वेळीच या ठिकाणी एवढ्यांदा का येतात? ते या ठिकाणी केवळ प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी येतात. ती लोकं विनाकारण प्रश्न उपस्थित करत आहेत. ही कोणतीही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेली घोषणा नाही. कन्याश्री, रूपाश्री आणि आरोग साथी या योजना योग्यरित्या काम करत आहेत," अशी प्रतिक्रिया पश्चिम बंगालचे शहर विकास मंत्री फिरहद हकिम यांनी सांगितलं. 

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीChief Ministerमुख्यमंत्रीwest bengalपश्चिम बंगालprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी