शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
2
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
3
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
4
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
5
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
6
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
7
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
8
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
9
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
10
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
11
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
12
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
13
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
14
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
15
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

ममतांनी साथ सोडली, नितीश कुमार गेले; ‘इंडिया’चे काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 6:51 AM

विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीत सध्या सर्वकाही व्यवस्थित असल्याचे दिसत नाही. सुरुवातीला तृणमूलने स्वबळावर लढण्याची केलेली घोषणा आणि त्यापाठोपाठ नितीश कुमार यांनी ‘एनडीए’शी हातमिळवणी केली.

नवी दिल्ली - विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीत सध्या सर्वकाही व्यवस्थित असल्याचे दिसत नाही. सुरुवातीला तृणमूलने स्वबळावर लढण्याची केलेली घोषणा आणि त्यापाठोपाठ नितीश कुमार यांनी ‘एनडीए’शी हातमिळवणी केली. २८ पक्ष असलेल्या ‘इंडिया’तील दोन प्रमुख पक्ष गेल्याने २६ घटक पक्ष राहिले आहेत. आतापर्यंत झालेल्या बैठकांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला नाही.  त्यामुळेच मोठ्या घटक पक्षांनी वेगळी भूमिका मांडल्याने ‘इंडिया’पुढील आव्हाने वाढली आहेत.

ममतांच्या स्वबळाच्या घोषणेचा कुणाला फायदा? बंगालमधील लोकसभेच्या ४२ पैकी गतवेळी तृणमूलने २२, काँग्रेसने २, भाजपने १८ जागा जिंकल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत तृणमूल, काँग्रेस व डावे एकत्र आले असते, तर त्याचा फटका भाजपला बसला असता.मात्र, तृणमूलने स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे.कारण मागील निवडणुकीत भाजप २२ जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यांना यावेळी तृणमूल व काँग्रेसमधील मतविभाजनाचा फायदा होऊ शकतो. 

अन्य राज्यांमध्ये जागावाटपाचा पेच बंगाल व बिहारवगळता अन्य राज्यांमध्ये ‘इंडिया’पुढील जागावाटपाचा पेच कायम आहे. पंजाबमध्ये आपसोबत, यूपीमध्ये समाजवादी पार्टी, झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा यांच्यासोबत, महाराष्ट्रात राष्ट्रवादी-शिवसेनासोबत काँग्रेसला जागावाटपाचा पेच सोडवावा लागणार आहे.

नितीश कुमार एनडीएत गेल्याचा परिणाम काय? - नितीश कुमार यांचा जदयु एनडीएत गेल्याने केवळ बिहारमध्येच नव्हे, तर देशात ‘इंडिया’ला फटका बसू शकतो.- जदयुने गत निवडणुकीवेळी देशातील ७ राज्यांमध्ये उमेदवार उतरविले होते. केवळ बिहारमध्ये विजय मिळविता आला असला, तरी लक्षद्वीप, मणिपूर, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, जम्मू- काश्मीर, पंजाबमध्ये बरीच मते मिळविली होती.- विशेषतः बिहार, यूपी व पंजाबमध्ये जदयुने भाजप उमेदवारांचे नुकसान केले होते; परंतु आता त्यांना फायदा होणार आहे.

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा