शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
3
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
4
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
5
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
6
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
7
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
8
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
9
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
10
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
11
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
12
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
14
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
15
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
16
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
17
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
18
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
19
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
20
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक

ममता बॅनर्जी यांनी केंद्राला फटकारले

By admin | Published: July 09, 2017 3:13 AM

गोरखालँडच्या आंदोलनाला भाजपाच्या दिल्लीतील नेत्यांची चिथावणी असल्याचा आरोप करतानाच, राज्याने विनंती केली नसतानाही केंद्र सरकारने लष्कर पाठविले

कोलकाता : गोरखालँडच्या आंदोलनाला भाजपाच्या दिल्लीतील नेत्यांची चिथावणी असल्याचा आरोप करतानाच, राज्याने विनंती केली नसतानाही केंद्र सरकारने लष्कर पाठविले आहे आणि केंद्र राज्यांच्या स्वायत्ततेत हस्तक्षेप करीत आहे, अशा शब्दात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी केंद्राला फटकारले. गोरखालँडचे नेते आम्हाला भाजपाचा पाठिंबा असल्याचे जाहीरपणे सांगत आहेत. दुसरीकडे भाजपा मात्र भूमिका घेताना दिसत नाही. भाजपाच्या छोट्या राज्यांबाबतचे धोरण पाहता, गोरखालँडच्या समर्थकांना भाजपाचा छुपा पाठिंबा असावा, असे सुरुवातीपासून सर्रास बोलले जात होते. बशीरहाट व बदुरिया येथील वातावरण बिघडविण्यास आणि तिथे धार्मिक विद्वेष निर्माण करण्यास काही संघटना जबाबदार आहेत, असे सांगून, त्यांनी त्याबद्दलही नाव न घेता भाजपावर टीका केली. त्या म्हणाल्या, दोन धार्मिक संघटनांवर राज्य सरकारने बंदी घातली आहे. बशीरहाट व बदुरिया येथील दंगलींची न्यायालयीन चौकशी केली जाईल. राज्यातील कायदा व सुव्यवस्था नीट राखण्यात केंद्र सरकार आम्हाला मदत करीत नाही, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.सीमा सुरक्षेचे प्रभारी कोण आहे? केंद्र की राज्य? असा सवाल करून त्या म्हणाल्या की, राज्यात शांतताभंंग करणे हे भाजपाचे कटकारस्थान आहे. दंगलीच्या काळात खोटे चित्रण दाखवून वातावरण बिघडवू पाहणाऱ्या दोन राष्ट्रीय टीव्ही चॅनलच्या विरुद्ध कारवाई करणार आहोत. (वृत्तसंस्था)ममता बॅनर्जी यांनी भाजपावर टीका केली. त्या म्हणाल्या की, मोदी सरकार आणि भाजपा येथे शांतताभंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. सीमेपलीकडून लोकांना राज्यात प्रवेश दिला जात असून, येथील सांघिक रचनाच नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. येथील पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात आली आहे. बशीरहाटमध्ये येत असलेल्या भाजपाच्या एका तीन सदस्यीय टीमला रोखण्यात आले आहे. परिस्थिती बिघडविण्यास कारणीभूत ठरणारी इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.तीन खासदारांना अटकभाजपाच्या खासदारांचे शिष्टमंडळ आज बशीरहाट येथे भेटीसाठी निघाले असता, त्यांना अडविण्यात आले. शिष्टमंडळात भाजपाच्या खा. मीनाक्षी लेखी, ओम माथूर व सत्यपाल सिंग यांचा समावेश होता. त्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, तेथील लोकांना त्रस्त करण्याची काय गरज आहे? तृणमूलचे खासदारही तेथे गेले नाहीत. राष्ट्रपती राजवट लागू करा : भाजपाराज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती गंभीर झाली असून, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपाच्या राज्य शाखेने केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले की, आम्ही राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेतली आणि राज्यातील गंभीर स्थितीसाठी राज्य सरकार जबाबदार असल्याचे सांगितले. दंगलग्रस्त भागातील लोकांना भरपाई देण्याची मागणीही भाजपाने केली आहे. केंद्र सरकार राज्य सरकारला मदत करत नाही, हा ममता बॅनर्जी यांचा आरोपही घोष यांनी फेटाळून लावला.