शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ममतांचा मोदी सरकारला 'पाठिंबा'; अमित शहांच्या प्रस्तावाला चक्क हिरवा कंदील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 19:05 IST

लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये वाक्युद्ध पाहायला मिळाले होते.

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात राज्यसभेमध्ये अनेक विधेयके मंजूर झाली नाहीत. कारण राज्यसभेत विरोधकांची संख्या जास्त होती. मात्र, दुसऱ्या कार्यकाळात हे चित्र पालटल्याचे दिसत आहे. आज राज्यसभेत मोदी सरकारच्या दोन विधेयकांना ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. ममता-शहा वादानंतर टीएमसीच्या या पावलामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये वाक्युद्ध पाहायला मिळाले होते. शारदा चीटफंड घोटाळ्यात कोलकाताचे पोलिस महासंचालकांवर कारवाईसाठी सीबीआयचे अधिकारी पोहोचले होते. त्यानंतरचा केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा वाद, लोकसभेवेळी शहा यांनी उघडलेला मोर्चा, शहांच्या रॅलीवेळी झालेला वाद आदी मुद्द्यांमुळे मोदी आणि ममता यांच्यात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मोदींनी रॅलीवेळी ममता कुर्ता पाठवत असल्याचे सांगितले होते. तेव्हा ममतांनी मातीचे लाडू खायला घालण्याचे सांगितले होते. एवढ्या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर ममतांच्या पक्षाने राज्यसभेत मोदींना पाठिंबा देणे आश्चर्याचे मानले जात आहे. 

राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो, याचा प्रत्यय राज्यसभेत आल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी नुकताच जम्मू काश्मीरचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी तेथील राष्ट्रपती राजवटीचा काळ सहा महिन्यांनी वाढविण्याची घोषणा केली होती. त्यानंतर लगेगच संसदेत मंजुरीही मिळविली होती. मात्र, राज्यसभेची मंजुरी मिळणे गरजेचे होते. राज्यसभेत सध्या विरोधकांचेच संख्याबळ जास्त आहे. यामुळे ट्रिपल तलाक सारखे विधेयक रेंगाळले आहे. यामुळे विरोधकांचा पाठिंबा मिळविणे भाजपला कठीण जाणार होते. 

शहा यांनी जम्मू आणि काश्मीर आरक्षण अधिनियम 2004 चे दुरुस्ती विधेयक सोमवारी राज्यसभेत मांडले. याआधी शुक्रवारी दोन्ही प्रस्ताव लोकसभेत मांडण्यात आले होते. तेथे बहुमताने हे प्रस्ताव मंजूर झाले होते. राज्यसभेत या विधेयकाला समाजवादी पार्टी आणि बिजू जनता दलाने पाठिंबा दिला होता. मात्र, ममता बॅनर्जींच्या टीएमसी सदस्यांनीही पाठिंबा दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. यापूर्वी मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर आभार प्रदर्शनावेळी राज्यसभेत सदस्यांना आवाहन केले होते. जनतेचा जनादेश विधेयकांना मंजुरी देण्यात अडचणी आणून दाबून टाकू नये, असे मोदी म्हणाले होते.   

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाBJPभाजपाAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगालRajya Sabhaराज्यसभा