शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

ममता यांनी दिली थेट मोदी-शहांना टक्कर; विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये ठरल्या अग्रेसर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 13:14 IST

ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला टार्गेट केल्याने अन्य विरोधी पक्ष त्यांच्यासोबत आले आहेत. अखिलेश यादव, तेजस्वी यादव, केसीआर, चंद्राबाबू नायडू अशा नेत्यांनी ट्विट करत ममता यांना पाठिंबा दिला आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्प्यातील प्रचाराला रंगत आली असताना सर्व देशाचं लक्ष्य पश्चिम बंगालमधील होणाऱ्या राजकारणाकडे लागलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना टक्कर दिली आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपाला पश्चिम बंगालमधील कडवी लढत दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या राड्यानंतर मायावतीपासून राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षातील अन्य नेत्यांनीही ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे निवडणुका संपल्यानंतर भविष्यात गरज पडलीस तर विरोधी पक्ष ममता बॅनर्जी यांच्यामागे उभे राहण्याचे संकेत मिळेत आहेत. 

कोलकाता येथे अमित शहा यांच्या रोड शोमध्ये हिंसाचार घडला त्यानंतर निवडणूक आयोगानेही कडक कारवाई करत पश्चिम बंगालमधील प्रचारावर एक दिवस आधीच बंदी आणली. गुरुवारी रात्री 10 पर्यंत निवडणुकीचा प्रचार करता येईल असे निवडणूक आयोगाने आदेश दिले. ज्यानंतर ममता बॅनर्जी यांनी भाजपाला आणि निवडणूक आयोगालाही लक्ष्य केलं. 

ममता यांच्यामागे उभा राहिला विरोधी पक्षममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला टार्गेट केल्याने अन्य विरोधी पक्ष त्यांच्यासोबत आले आहेत. अखिलेश यादव, तेजस्वी यादव, केसीआर, चंद्राबाबू नायडू अशा नेत्यांनी ट्विट करत ममता यांना पाठिंबा दिला आहे. तर काँग्रेस, मायावतींनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पश्चिम बंगालमध्ये 2 सभा असल्यानेच निवडणूक आयोगाने रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करण्यास मुभा दिल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. 

ममता बॅनर्जी यांनीही विरोधी पक्षातील नेत्यांचे ट्विट करत आभार व्यक्त केले आहेत. त्यामुळे निवडणूक निकालांपूर्वी विरोधी पक्ष पश्चिम बंगालमधील राड्यानंतर एकत्र झाला. ते भाजपासाठी चिंतीत करणारे आहे. पश्चिम बंगालमधील ही घटना विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये ममता बॅनर्जी यांना स्पर्धेत अग्रेसर करत आहे. 

मागील काही महिन्यांपूर्वीही ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणलं होतं. त्यामुळे विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात ममता बॅनर्जी यांच्यासाठी पश्चिम बंगालमधील राडा महत्त्वपूर्ण ठरला आहे. 

   

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMamata Banerjeeममता बॅनर्जीAkhilesh Yadavअखिलेश यादवRahul Gandhiराहुल गांधीAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदी