शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

जनता विरोधात गेल्याने ममतांची घाबरगुंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 06:50 IST

नरेंद्र मोदी : घोटाळ्यांमुळे पश्चिम बंगालची प्रतिमा कलंकित

कुचबिहार : केंद्रीय योजनांचा अन्य राज्यांना मिळत असलेला लाभ विकासाच्या मार्गातील गतिरोधक बनलेल्या ममता बॅनर्जींमुळे पश्चिम बंगालला मिळू शकला नाही अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. राज्यातील जनता विरोधात गेल्यामुळे ममता बॅनर्जी यांची घाबरगुंडी उडाल्याचा दावाही मोदी यांनी केला.

येथील प्रचारसभेत ते म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकांत तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव होणार हे कळून चुकल्याने ममता बॅनर्जी त्याचा सारा राग पश्चिम बंगालमधील सरकारी अधिकाऱ्यांवर तसेच निवडणूक आयोगावर काढत आहेत. कुचबिहारमधील सभेसाठी लोक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहू नयेत म्हणून राज्य सरकारने नाना उपाय करून पाहिले. परंतु अशा बालिश वर्तनाने निवडणुका जिंकता येत नाहीत. ममता बॅनर्जी यांच्या जुलमी राजवटीपासून पश्चिम बंगालमधील जनतेला मुक्तता हवी आहे. इथे तृणमूल काँग्रेसच्या गुंडांचे राज्य सुरू असून त्यांना सत्तेतून घालविण्यासाठी लोक आता समर्थ पर्यायाच्या शोधात आहेत. गरीबातल्या गरीब माणसाचे बँकखाते आता उघडण्यात आले असून हे केवळ भाजप सरकारमुळेच शक्य झाले. प्रत्येक घरात स्वयंपाकाचा गॅस, मोबाइल फोन, इंटरनेट पाहायला मिळते ते आमच्याच सरकारमुळे. ममता बॅनर्जी गतिरोधकाची भूमिका बजावत असून त्यांनी राज्याच्या विकासात अडथळे निर्माण केले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत झालेल्या घोटाळ्यांमुळे पश्चिम बंगालची प्रतिमा कलंकित झाली आहे.भाजपच्या प्रत्येक कामगिरीवर टीकामोदी यांनी सांगितले की, पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानातील बालाकोट येथे भारतीय हवाई दलाने हल्ले चढविले. केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या प्रत्येक कामगिरीवर ममता बॅनर्जी यांनी टीका केली आहे. जम्मू-काश्मीरसाठी पंतप्रधानपद पुन्हा निर्माण करावे अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केली होती. एकाच देशात दोन पंतप्रधान असावेत, अशी मागणी करणाऱ्या लोकांसोबत ममता बॅनर्जी यांनी राजकीय हातमिळवणी केली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी