शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

...अन् त्यानं काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत फडकावला तिरंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 19:41 IST

बुधवारी काँग्रेसनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठा गोंधळ झाला आहे.

नवी दिल्ली- बुधवारी काँग्रेसनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठा गोंधळ झाला आहे. पत्रकार परिषदेदरम्यान एक व्यक्ती अचानक तिरंगा हातात घेऊन मध्येच येऊन उभा राहिला. त्यानं काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हस्तक्षेप केला आणि योगी आदित्यनाथ यांना अजय सिंह बिश्ट म्हणणं म्हणजे भारतीय संस्कृतीचा अपमान असल्याचं सांगितलं. तसेच त्यानं वंदे मातरम, भारत माता की जयच्याही घोषणा दिल्या. त्यामुळे पत्रकार परिषदेत एकच खळबळ उडाली.या व्यक्तीचं नाव नचिकेता वाल्हेकर असून, तो महाराष्ट्रातल्या हिम्मतनगरमधला रहिवासी आहे. तो भाजपा कार्यकर्ता असल्याचंही म्हटलं जातंय. तो म्हणाला, त्यांची ममता बॅनर्जींचं नाव घेण्याची हिंमत होत नाही. त्यांना निवडणूक सांभाळता येत नाही. असे लोक फक्त मोदी-शहा, मोदी-शहा करतात. मोदी-शाहांनी देशासाठी बरंच काही केलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनं योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशमधील कायदा-सुव्यवस्था सांभाळण्यात अपयश आल्याचं म्हटलं आहे. लोकसभेत होत असलेल्या पराभवामुळेच काँग्रेस असे आरोप करत असल्याचंही तो म्हणाला आहे.रायबरेलीमध्ये काँग्रेसचे आमदार अदिती सिंह झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करत पवन खेडा म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये जी हिंसा झाली, आमच्या आमदारावर जीवघेणा हल्ला झाला. आज प्रियंका तिकडे गेल्या आहेत. इथे आपल्याला मोदी-शाह मॉडल दिसेल. मोदी-शाह मॉडल बंगालमध्येही आहे आणि उत्तर प्रदेशमध्येही आहे.  जसं उत्तर प्रदेशात आमदार सुरक्षित नाहीत. हे अजय सिंह बिश्त आणि मोदी-शाह मॉडल आहे. विचार करा लोकांची अवस्था काय होत असेल. उत्तर प्रदेश राज्यातील व्यवस्था बिघडली आहे. मोदी-शाहांचे फक्त 8-9 दिवस बाकी आहेत, असंही काँग्रेसवाले म्हणाले आहेत.