शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

नांदा सौख्यभरे! तब्बल 10 वर्षे गर्लफ्रेंडला एका खोलीत ठेवलं लपवून; आता बांधली लगीनगाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 17:57 IST

man marriage his girlfriend hide her in room for 10 years : एका प्रियकराने कोणालाही भनक न लागता त्याच्या प्रेयसीला तब्बल दहा वर्ष एकाच रुममध्ये लपवून ठेवलं.

नवी दिल्ली - प्रेमासाठी अनेक जण वाटेल ते करतात. त्यांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से हे नेहमीच ऐकायला मिळतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. एका प्रियकराने कोणालाही भनक न लागता त्याच्या प्रेयसीला तब्बल दहा वर्ष एकाच रुममध्ये लपवून ठेवलं. आश्चर्य म्हणजे त्याच्या घरातील सदस्यांनाही त्यांच्या घरात 10 वर्षापासून एक अज्ञात युवती राहतेय त्याची कल्पना नव्हती. त्यानंतर आता या दोघांनी कायदेशीर लग्न केल्याची घटना समोर आली आहे. 

या अजब प्रेमाची सुरूवात फेब्रुवारी 2010 मध्ये झाली तेव्हा 18 वर्षीय सजिथा नावाची एक मुलगी अचानक घरातून गायब झाली. सजिथा केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील आईलूर येथील तिच्या राहत्या घरातून गायब झाली होती. नातेवाईकाकडे जाण्याच्या बहाण्याने ती घरातून बाहेर पडली ती कधीच परतली नाही. ना ती नातेवाईकांच्या घरी गेली ना स्वत:च्या घरी आली. घरातून बाहेर गेलेली सजिथा बेपत्ता झाली. खूप वेळ वाट पाहिल्यानंतर जेव्हा सजिथा घरी परतली नाही तेव्हा तिच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला परंतु सजिथा ठावठिकाणा लावण्यास त्यांनाही अपयश आलं.

"आम्ही गेल्या दहा वर्षांपासून एकत्र राहत आहोत"

सजिथा तिच्याच गावातील 24 वर्षीय मुलावर प्रेम करत होती. रेहमान आणि सजिथा एकाच गावात राहत होते. त्यांच्या या प्रेमाची कुटुंबाला, मित्रांना आणि नातेवाईकांना काहीच माहिती नव्हती. याच गोष्टीचा फायदा घेत दोघांनीही हा प्लॅन बनवला. दहा वर्ष कोणालाही भनक न लागता ते दोघंही एकाच छताखाली राहत होते. जेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला तेव्हा रेहमान विरोधात तक्रार करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी दोघांना कोर्टात हजर केलं. यावेळी त्यांनी सांगितलं की, आम्ही गेल्या दहा वर्षांपासून एकत्र राहत आहोत. आणि भविष्यातही एकत्र राहण्याची इच्छा आहे. कोर्टाने त्यांना एकत्र राहण्याची परवानगीदेखील दिली आहे. 

पलक्कड जिल्ह्यातील नेनमारामध्ये केलं लग्न

जेव्हा रेहमानच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती झाली तेव्हा काही जण खूप खूश झाले तर अनेकांना हे आवडलं नाही. मात्र यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी पलक्कड जिल्ह्यातील नेनमारामध्ये कायदेशीर लग्न केलं. यावेळी सजिथाचे आई-वडील लग्नात सामील झाले. मात्र रेहमानचे काही नातेवाईक नाखूश असल्याने ते या लग्नाला आले नाहीत. यावेळी लग्नात रेहमान आणि सजिथाने  मिठाई देखील वाटली आणि लग्नात आल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. तसेच रेहमानने आम्हाला सुखी जीवन जगायचं असल्याचं सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :KeralaकेरळIndiaभारतmarriageलग्न