शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'मानव नेहमीसाठी पृथ्वीवर राहणार नाही, नामशेष होईल म्हणूनच...' ISRO प्रमुखांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 19:24 IST

'पृथ्वी नेहमीसाठी सुरक्षित राहणार नाही, मानवदेखील डायनासोरप्रमाणे नामशेष होईल.'

नवी दिल्ली: सध्या जगातील अनेक देश चंद्र आणि मंगळावर राहण्याच्या शक्यता पडताळत आहेत. याबाबत अनेक वर्षांपासून संशोधनदेखील सुरू आहे. दरम्यान, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी चंद्र आणि मंगळवार राहण्याबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. अनेकजण विचारतात की मानवाला अवकाशात पाठवण्याची काय गरज? आपली पृथ्वी राहण्यासाठी योग्य जागा आहे, मग अवकाश प्रवास कशाला? याला उत्तर देताना इस्रो प्रमुख म्हणाले की, 'डायनासोरप्रमाणे एक दिवस मानव पृथ्वीवरुन नष्ट होईल. एकतर तो स्वत: याला जबाबदार असेल किंवा निसर्ग त्याला नष्ट करेल.'

एका कार्यक्रमात बोलताना इस्रो प्रमुख म्हणाले की, 'चंद्र आणि मंगळावर सातत्याने लघुग्रहांचा आघात होत असतो. कारण तेथील वातावरण आणि संरक्षणासाठी उपलब्ध नसलेले तंत्रज्ञान. पण, पृथ्वीवर अनुकूल वातावरण आहे, ज्यामुळे आपण अनेक वर्षांपासून लघुग्रहांच्या हल्ल्यापासून वाचत आलो आहोत. पण, मानव पृथ्वीवर कायम राहणार नाही. डायनासोर नष्ट झाले, त्याप्रमाणे मानवदेखील नष्ट होईल. मानवाने राहण्यासाठी नवीन जागा शोधली नाही, तर एक दिवस पृथ्वीसह मानवाचाही अंत होईल.'

मानवी अंतराळ उड्डाणाची का गरज आहे?'अंतराळ संशोधनासाठी अंटार्क्टिकावर जगभरातील अनेक देशांनी केंद्रे उभारली आहेत. भारताचेही तेथे तीन केंद्रे आहेत. याची काय गरज काय होती? भविष्यात आपण ठराविक क्षेत्रात पाऊल ठेवले नाही तर आपण तेथून बाहेर फेकले जाऊ. भारताने चंद्रावर पाऊल ठेवले नाही तर भविष्यात जगभरातील लोक तेथे जातील आणि भारताला येऊ देणार नाहीत. त्यामुळेच या अभ्यासासाठी भारताने अंटार्क्टिकामध्ये केंद्र उभारले आहे.' 

लवकरच भारताचे स्पेश स्टेशन असेलसोमनाथ पुढे म्हणाले की, 'गगनयान हा एक नवीन प्रयत्न आहे. यावर्षी आपण मानवी स्पेसफ्लाइट एक्सपो सुरू करत आहोत. 100 वर्षांनंतर आपण अंतराळात आपले स्पेस स्टेशन बनवू. फक्त गगनयानापर्यंत थांबणार नाही. भविष्यात जगातील मोठ्या अंतराळ मोहिमेत अनेक मोठे देश सामील होतील, तेव्हा त्यात भारतातील अंतराळवीरांचाही समावेश असायला हवा.' 

पुढच्या पिढ्या सौरमालेच्या बाहेर जातीलसोमनाथ म्हणाले की, 'भारताने चांद्रयान-1, मंगळयान यासह अनेक मोहिमा केल्या आहेत, ज्यामुळे आपला देश, आपले शास्त्रज्ञ, आपले लोक आणि आपली इस्रो जगातील कोणत्याही देशाशी स्पर्धा करू शकतात, हे सिद्ध झाले आहे. पण आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांची सुरक्षा, आरोग्य आणि समृद्धी. म्हणूनच आम्ही त्यांना हवामान, शेती, आपत्ती, जलवाहतूक, दळणवळण अशा सुविधा देत आहोत. आपल्या पुढच्या पिढ्या केवळ इतर ग्रहांवरच नव्हे तर सूर्यमालेतील आणि त्यापुढील ग्रहांवरही जातील,' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :isroइस्रोNASAनासाMarsमंगळ ग्रह